मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. यावर आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे. ७:३० वाजता शपथविधी होणार यामध्ये एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. शिवसेनेच्या आमदारांची कुचंबणा झाली. आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे, भाजपाने हा निर्णय केला की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील.
पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी यावेळेस सांगितले की, महाविकास आघाडीमुळे निर्णय घेता येत नव्हते, माझ्या काही समस्या होत्या परंतु त्या बाजुला असुद्यात किंबहुणा आमदाराच्या मतदारामध्ये असलेल्या समस्या सोडवल्या जात नव्हत्या. एक मजबुत सरकार यापुढे पहायला मिळेल आणि याला भाजपचे ही सहकार्य असेल.