रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच भागात गोठवणारी थंडी पडल्याने ग्रामीण भागातील जनतेसह शहरी भागातही स्वेटरचा वापर वाढला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे थंडीचा मोसम वाढला असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत तर पारा ९.७ अंशावर आला होता.
रत्नागिरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पारा कमालीचा खाली आल्याने हुडहुडी भरणारी थंडी दिवसा जाणवत आहे. सूर्य डोक्यावर आला तरी थंडीचा कहर मात्र कमी होत नाही. त्याचा परिणाम सर्वांवरच होताना दिसून येत आहे. मात्र, पडलेल्या थंडीमुळे आंबा बागायतदारांसह काजू बागायतदारही खूश झाले आहेत. यावर्षी आंब्याचे चांगले पीक येईल, असा अंदाज आंबा शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. कडाक्याच्या थंडीमुळे आजारपणामध्ये वाढ होण्याची शक्यता विविध डॉक्टरांकडून वर्तविली जात आहे.
दिनेश पाटील, गणेश गायकर यांची पत्रकार परिषदेत माहिती पेण (देवा पेरवी): पेण मधील साई भक्तांनी…
मुरुड( संतोष रांजणकर): मुरुड बीचवर पर्यटकांची गर्दी आज पाहावयास मिळाली. वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेले पर्यटकांनी…
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध नवी दिल्ली ( वृत्तसंस्था): श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून विरोध होत…
मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळेस महिला टी-२० वर्ल्डकप…
सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला, पण माझा कार्यक्षेत्र मुंबई होते. बाळासाहेबांनी मला…
मुंबई: पंजाब किंग्स(punjab kings) आणि चेन्नई सुपर किंग्स(chennai super kings) यांच्यात आयपीएल २०२४चा(ipl 2024) ५३वा…