होंगझाऊ: आशियाई स्पर्धा २०२३मध्ये(asian games 2023) भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. टीम इंडियाने अंतिम सामन्यात गेल्या वेळचा आशियाई स्पर्धेचा विजेता संघ जपानला ५-१ असे हरवले. याआधी पूल राऊंडमध्येही भारत आणि जपान आमनेसामने आले होते. त्यावेळेसही भारताने जपानला ४-२ असे हरवले होते.
अंतिम सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत जपानला नामोहरम केले. भारताने जपानला केवळ एक गोल करण्याची संधी दिली.
या सुवर्णपदकासह भारतीय हॉकी संघाने २०२४मध्ये पॅरिसमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. सामन्याबाबत बोलायचे झाल्यास पहिल्या क्वार्टरमध्ये दोनही संघांना गोल करता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये २५व्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल करण्यात आला. मनदीप सिंहने हा गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये ३२व्या मिनिटाला भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने दुसरा गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसरा क्वार्टर संपण्याच्या आधी अमित रोहिदास भारतासाठी तिसरा गोल केला. या पद्धतीने भारताने तिसऱ्या क्वार्टरपर्यंत ३-० अशी आघाडी घेत आपला विजय पक्का केला.
चौथ्या क्वार्टरच्या सुरूवातीच्या तीन मिनिटांनीच म्हणजेच४८व्या मिनिटाला अभिषेकने भारतासाठी चौथा गोल केला. या गोलसह भारताने ४-० अशी आघाडी घेतली. यानंतर तीन मिनिटांनी म्हणजेच ५१व्या मिनिटाला जपानने आपले खाते खोलले आणि संघाला पहिला गोल केला. सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना भारताने पाचवा गोल केला. ५९व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंहने संघासाठी पाचवा गोल करत जपानविरुद्ध ५- १ असा विजय मिळवला.
कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…
मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…
मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता…
मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५…
नूंs: नूंहमध्ये मोठा अपघात घडला आहे. येथे शुक्रवारी रात्री भक्तांनी भरलेल्या बसला अज्ञात कारणामुळे आग…
सोमवारी २० मे रोजी मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. सहा लोकसभा मतदारसंघांसाठी…