मुंबई: भारतीय संघ २०२४मध्ये इंग्लंडशिवाय श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांसोबत खेळणार आहे. दरम्यान, आतापर्यंत बीसीसीआयचे संपूर्ण वेळापत्रक समोर आलेले नाही. मात्र जूनपर्यंत टीम इंडिया कोणाकोणासोबत खेळणार हे ठरलेले आहे.
दरम्यान, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ३ जानेवारीपासून खेळत आहे. यानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध आपल्या भूमीवर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेची सुरूवात २५ जानेवारीासून होईल. तर ही मालिका ११ मार्चपर्यंत खेळवली जाणार आहे. या दरम्यान दोन्ही संघ ५ कसोटी सामने खेळतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्स टेबलच्या हिशोबाने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेनंतर टी-२० सामन्यांचे सत्र सुरू होईल. या मालिकेनंतर आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे. आयपीएलनंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० वर्ल्डकप २०२४चे आयोजन होणार आहे.
टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघ इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. दरम्यान, बीसीसीआयकडून याबाबतचे कोणतेही वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात भारताला श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासोबत मालिका खेळायची आहे.
कोकणी बाणा : सतीश पाटणकर मुंबई शहरात अनेक पर्यटन स्थळे, प्राचीन, प्रसिद्ध मंदिरांचा वारसा लाभला…
नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड प्रेमकहाणी या लेखामधून दोन प्रेमी जीवांची झालेली ताटातूट, तरी…
विशेष : लता गुठे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे आणि त्यांच्या एकमेकांमध्ये गेलेल्या फांद्या यामुळे…
विशेष : भालचंद्र ठोंबरे महाभारतात कौरव पांडवांचे युद्ध होणार, हे निश्चित झाल्यावर, देशोदेशीच्या राजांनाही या…
नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे बाबुभाई मिस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘पारसमणी’(१९६३) ही एक छोटी संगीत मेजवानी…