T-20 world cup: मोहम्मद शमी टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर, पंतसमोर ठेवली ही अट

Share

मुंबई: टीम इंडियाने(team india) नुकतीच इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. आता भारतीय खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होतील. याची सुरूवात २२ मार्चपासून होत आहे. आयपीएल २०२४च्या सुरूवातीआधी गुजरात टायटन्सला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएलमध्ये खेळणार नाही आहे.

शमीची गेल्याच महिन्यात सर्जरी झाली होती. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली बातमी समोर आली आहे. ऋषभ पंत आयपीएल २०२४च्या माध्यमातून प्रतिस्पर्धी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. पंतला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून हिरवा कंदील मिळाला आहे. पंत डिसेंबर २०२२मध्ये एका भीषण कार अपघातानंतर क्रिकेटपासून दूर आहे.

ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि केएल राहुल यांच्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी अपडेट दिले आहे. शाह यांनी सांगितले की शमी या वर्षी सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन करू शकतो. भारत सप्टेंबरमध्ये दोन कसोटी आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचे यजमानपद करणार आहे. शमीने भारतासाठी शेवटचा सामना क्रिकेट वर्ल्डकप २०२३मध्ये खेळला होता.

शमी टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर

जय शाह यांनी मीडियाशी बोलताना सांगितले, शमीची सर्जरी झाली आहे आणि तो भारतात परतला आहे. बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मैदानावरील मालिकेसाठी शमीचे पुनरागमन शक्य आहे. केएल राहुलला इंजेक्शनची गरज होती. त्याने रिहॅब प्रक्रिया सुरू केली आहे आणि तो एनसीएमध्ये आहे. राहुलला दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धचे कसोटी मालिकेतील शेवटचे चार सामने खेळू शकला नव्हता. लंडनमध्ये उपचार केल्यानंतर तो लखनऊ सुपरजायटंससाठी खेळण्याची शक्यता आहे.

पंतसमोर ठेवली ही अटक

बीसीसीआय सचिव म्हणाले ऋषभ पंत आयपीएलमध्ये पुनरागमनासाठी तयार आहे. तो चांगला फलंदाजी करत आहे. तो चांगली किपिंगही करत आहे. आम्ही लवकरच त्याला फिट घोषित करू. तर तो टी-२० वर्ल्डकप खेळू शकला तर ही आमच्यासाठी मोठी गोष्ट असेल. तो आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. जर तो किपिंग करत असला तर वर्ल्डकप खेळू शकतो. आयपीएलमध्ये तो कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Tags: team india

Recent Posts

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

9 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

10 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

10 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

11 hours ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

11 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

11 hours ago