MI vs SRH: ‘सुर्या’ च्या प्रकाशाने मुंबई झळकली, ७ गडी राखुन हैदराबादवर विजय…

Share

MI vs SRH: मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून सलामीवीर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. हेडने ३० बॉलमध्ये ७ चौकार आणि १ षटाकारच्या मदतीने ४८ धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा विशेष काही करु शकला नाही,  ११ धावांवर तो बाद झाला. मयंक अग्रवाल ५ धावा करुन बाद झाला. नितीश रेड्डी २० धावांवर माघारी परतला. पीयूष चावला याने हेन्रिक क्लासेन याला २ धावावर बाहेरचा रस्ता दाखवला. मार्को जान्सेन १७ रन्स करुन बाहेर गेला.

मुंबईने हैदराबादला झटके देत बॅकफुटवर ढकललं होतं. मात्र अडचणीच्या काळात कर्णधार पॅट कमिन्स याने नाबाद ३५ धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादला १५० धावांचा टप्पा पार पाडता आला. तर मुंबईकडून कॅप्टन हार्दिक पंड्या आणि पीयूष चावला या दोघांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले . हैदराबादने २० षटकात ८ गडी गमावून १७३ धावा केल्या.

हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा सामना करताना रोहित शर्मा ४ धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मार्को यान्सनने दुसरे षटक टाकले. षटकाच्या चौथ्या चेंडूवर ९ धावा काढून इशान किशन बाद झाला. मयंक अग्रवालने त्याचा झेल घेतला. त्यानंतर आलेला नमन धीर देखील काही विशेष करु शकला नाही.

मुंबई बॅकफुटवर असताना सूर्यकुमार यादवने दमदार कामगिरी करत शतक झळकावले. ५१ चेंडूत १०२ धावा करत तो नाबाद राहिला. तिलक वर्माने देखील सुर्याला मोलाची साथ दिली. ३२ चेंडुत ३७ धावा करून तिलकदेखील नाबाद राहिला. या दोघांनी १४९ धावांची भागीदारी करत मुंबईच्या गोटात विजयश्री खेचुन आणला. मुंबईने हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला.

Recent Posts

लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू हा अपघातच!

जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश! मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल…

1 hour ago

Bomb Threat : दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार

पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर…

2 hours ago

UPSC : युपीएससी परीक्षार्थींना दररोज ३००० रुपये देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठी चढाओढ सुरु असते. विद्यार्थी रात्रंदिवस…

2 hours ago

नरेंद्र मोदीच हॅटट्रिक करणार! पहिल्या १०० दिवसांचा रोडमॅप तयार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार असला तरी आपण तिस-यांदा सत्तेत…

3 hours ago

Yogi Adityanath : मोदी तिस-यांदा पंतप्रधान होतील आणि पाकव्याप्त काश्मीर सहा महिन्यांत भारताचा भाग असेल

योगी आदित्यनाथ यांचा ठाम विश्वास पालघर : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका पार पडणार असून…

5 hours ago

निवडणुकीआधी काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद! दोन दहशतवादी हल्ले; भाजपाच्या माजी सरपंचाची हत्या

जम्मू : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरु…

6 hours ago