मुंबई: जसजसा उन्हाळा वाढत आहे तसतसे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज वाढत आहे. येथे काही पदार्थ सांगत आहोत जे उन्हाळ्याच्या दिवसांत खास खाल्ले पाहिजेत. खासकरून निसर्गाने आपल्याला आपल्याला असे काही पदार्थ दिलेत जे उन्हाळ्यात खाल्ले पाहिजेत.
दही हे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रोबायोटिक्स असतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. तुम्ही दही कोणत्याही रूपात खाऊ शकता.
आवळा हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. यामुळे शरीर थंड राहते. तसेच प्रतिकारक्षमता वाढते.
पुदिन्याची प्रकृती थंड असते आणि उन्हाळ्यासाठी पुदिना चांगला. शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्ही आहारात पुदिन्याचा समावेश करू शकता. पुदिना डायजेशनमध्ये मदत करतो आणि पोटालाही शांत ठेवतो.
काकडी थंड आणि हायड्रेटिंग असते. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स आणि खनिजे असतात. काकडीच्या सेवनाने उन्हामुळे शरीराची होणारी काहिली कमी होते.
कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वोत्कृष्ट फळ आहे. यात पाण्याचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे शरीर हायड्रेट राखण्यास मदत होते. यात व्हिटामिन ए आणि सी मोठ्या प्रमाणात असते.
उन्हाळ्याच्या गरम दिवसांमध्ये जर शरीर हायड्रेट ठेवायचे असेल तर नारळपाणी उत्तम आहे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.
गुंतवणूकदारांना मिळेल दुप्पट परतावा मुंबई : भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक (Investment) करणे…
यूपीएससी परीक्षार्थींसोबत घडला धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) या विद्यार्थ्यांचे भवितव्य…
जाणून घ्या सविस्तर माहिती मुंबई : भाभा अणु संशोधन केंद्रात (BARC) नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या…
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (State Common Entrance Test Chamber) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि…
अघोरी प्रकाराने उडाली खळबळ नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik Crime) पंचवटी शहरातून एक अत्यंत भयानक…
जादू टोण्याच्या प्रकारासाठी मृतदेह चोरल्याचा संशय सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली…