मुंबई: आचार्य चाणक्य यांनी माणसाच्या या चुकांबद्दल सांगितले आहे ज्यामुळे ती व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही. या चुका माणसाची प्रगती रोखतात. त्या व्यक्तीने प्रयत्न जरी केले तरी ते यशस्वी होऊ शकत नाहीत.
आचार्य चाणक्य यांच्या मते पैशांची बचत आयुष्यात अतिशय महत्त्वाची आहे. कारण बचत केलेली रक्कमच वेळेला वापरता येते.
चाणक्य यांच्या मते जी व्यक्ती पैशांची बचत करत नाही ती नेहमी आर्थिक समस्येने ग्रस्त असते.
चाणक्य सांगतात व्यक्तीने नेहमी मेहनती आणि इमानदारीसोबत पुढे जात राहिले पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या व्यक्ती चुकीच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्या कधीच यशस्वी होत नाहीत.
आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार व्यक्तीने आपल्या आयुष्यात नेहमी एक ध्येय ठेवले पाहिजे. मात्र हे ध्येय कोणालाही सांगू नये.
अनेकजण आपल्या ध्येयाबद्दल दुसऱ्या लोकांना सांगतात. मात्र असे केल्याने त्यांनाच नुकसान होते.
आचार्य चाणक्य यांच्या मते आपले ध्येय इतर लोकांना सांगितल्याने ते पूर्ण होण्याची शक्यता कमी होते.
मुंबई: महाराष्ट्र बोर्डाच्या १२वीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपत आहे. आज म्हणजेच २१ मे २०२४ला…
मुंबई: घरात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसे टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि मायक्रोव्हेव वेळेसोबतच खराब होतात. जर…
मुंबई: यंदाच्या वर्षी आयपीएलचा १७वा हंगाम खेळवला जात आहे. या १७ वर्षात धोनी आणि रोहित…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध त्रयोदशी शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात. चंद्र राशी…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजकीय सारीपाटावरील वाटचाल पाहता त्यांच्याबाबतीत ‘कोण होतास तू, काय झालास…
सेवाव्रती: शिबानी जोशी ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली, ते ठिकाण…