विरार (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या अर्नाळा आगारातून सकाळी ७.४५ वाजता नियमित सुटणारी अर्नाळा-गुहागर व ७.५० वाजताची अर्नाळा-तुळजापूर ही एसटी बंद करण्यात आली आहे. तसेच दुपारी १२.३० वाजता नियमित सुटणारी अर्नाळा-विरार-पोलादपूर व सायंकाळी ६.३० वाजता अर्नाळा आगारात येणारी पोलादपूर-विरार-अर्नाळा या एसटीची सेवाही खंडित करण्यात आल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास झाला आहे.
रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्स वगळता नालासोपारा व अर्नाळा एसटी आगारातून सुटणाऱ्या एसटी बस हा एकमेव पर्याय सामान्य प्रवाशांजवळ कोकणात जाण्याकरता आहे. रेल्वेकरता प्रवाशांना दादर अथवा छत्रपती शिवाजी टर्मिनस गाठावे लागते. तर खासगी ट्रॅव्हल्सचे भाडेदर जास्त असल्याने व ते परवडत नसल्याने सामान्य प्रवाशांची पसंती एसटीच्या बसेसला जास्त आहे. त्यातही पोलादपूर व आसपासच्या परिसरात प्रवास करण्याकरता एसटी हाच उत्तम पर्याय असल्याने अर्नाळा व नालासोपारा एसटी आगारातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे.
मात्र या आगारातून नियमित सुटणाऱ्या एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्याने अर्नाळा आगारातून सकाळच्या वेळात कोकणात जाण्या-येण्याकरता आता एकही एसटी उपलब्ध नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास झालेला आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. कोकणी माणसाला अत्यंत प्रिय आणि त्याच्या हृदयाजवळचा हा सण आहे. या काळात एसटी महामंडळाने ही एसटी सेवा बंद करून कोकणी माणसांची निराशा केली आहे.
त्यामुळे ही एसटी सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. किंबहुना या एसटी फेऱ्यांसोबत विरार-अर्नाळा एसटी आगारातून दुपारी १ वाजता सुटून पोलादपूर येथे रात्रवस्ती करणारी बस सुरू करावी. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी सूचना प्रवाशांनी केली आहे.
दरम्यान, लोकआग्रह व प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन ही एसटी सेवा तात्काळ पूर्ववत करा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात देशमुख यांनी एसटी आगार व्यवस्थापकांना पत्रही दिले आहे.
देशात तिसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीच्या लढाईत आता आरक्षणाचा…
मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ…
माझे कोकण: संतोष वायंगणकर महाराष्ट्रातील कोकणची भूमी म्हणजे परमेश्वराला पहाटेच्या वेळी पडलेले सुंदर स्वप्न असं…
मुंबई: सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपरजायंट्सला १० विकेटनी हरवले आहे. लखनऊने पहिल्यांदा खेळताना १६५ धावांची सन्मानजनक…
सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या १५० वर्ष जुन्या इमारतीचे पावसाळ्यापूर्वी…
मुंबई: आजकालच्या युगात लठ्ठपणाने साऱ्यांनाच ग्रासले आहे. जो तो वाढत्या वजनाबाबत काळजीत दिसतो. खराब खाण्यापिण्याच्या…