SRH vs MI: हैदराबादने मुंबईला धुतले, ३१ धावांनी केली मात

Share

मुंबई: सनरायजर्स हैदराबादने आयपीएल २०२४च्या ८व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला ३१ धावांनी हरवले. सामन्यात हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद २७७ इतकी सर्वोच्च धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरादाखल मुंबईच्या संघाला २० षटकांत ५ बाद २४६ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईसाठी तिलक वर्माने प्रयत्न केले आणि ६४ धावांची सडेतोड खेळी केली. मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

मुंबईने सामन्यात टॉस जिंकत बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. पहिल्यांदा फलंदाजी करताना हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या रचली. याचा पाठलाग करताना मुंबईची मात्र पुरती दमछाक झाली. दरम्यान, मुंबईच्या फलंदाजांनी शेवटपर्यंत धावा करण्याचा प्रयत्न केला.

असा विखुरला डाव

२७८ म्हणजेच आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या मुंबईची सुरूवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि इशान किशनने पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. मात्र चौथ्या ओव्हरमध्ये पहिला झटका इशान किशनच्या रूपात बसला. त्याने १३ बॉलमध्ये २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या.

त्यानंतर मुंबईने दुसरा विकेट रोहित शर्माच्या रूपात गमावला. पाचव्या ओव्हरमध्ये १ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने २६ धावा करून रोहित परतला. यानंतर तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा जाग्या झाल्या. मात्र ११व्या ओव्हरमध्ये नमनची विकेट पडल्याने ही भागीदारी संपुष्टात आली. त्याने ३० धावा केल्या. यानंतर १५व्या षटकांत तिलक वर्मा पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर १८व्या षटकांत हार्दिक पांड्याच्या रूपात पाचवा झटका मुंबईला मिळाला.

Recent Posts

कमी पाणी प्यायल्यामुळे होऊ शकतो किडनीचा हा गंभीर आजार

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराच्या हिशेबाने भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.…

1 hour ago

Google Pixel 8a भारतात लाँच, ही आहे किंमत

मुंबई: Google Pixel 8a भारतात लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये अनेक दमदार फीचर्स, जबरदस्त…

2 hours ago

DC vs RR: सॅमसंगचा वादग्रस्त झेल, दिल्लीसमोर राजस्थान फेल…

DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…

10 hours ago

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शांततेत मतदान

महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…

11 hours ago

देशात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के तर महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…

11 hours ago

कडिपत्ता खाण्याने दूर होतात हे आजार

मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…

11 hours ago