नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलमध्ये न थकता खेळता, मग देशासाठी खेळायच्या वेळी मात्र विश्रांती का हवी? असा सवाल भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी देशाच्या वरिष्ठ खेळाडूंना विचारला आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या विश्रांती घेण्यावरून गावसकर व्यक्त झाले.
भारतीय संघ वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि पाच टी-२० सामने खेळण्यात येणार आहे. मात्र, या दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत या वरिष्ठ खेळाडूंनी विश्रांती मागितली आहे. यावरून सुनील गावसकर यांनी त्यांची कानउघडणी केली आहे.
‘तुम्ही आयपीएल खेळताना विश्रांती घेत नाही. मग भारतासाठी खेळताना तुम्ही विश्रांती का मागता? तुम्हाला भारतासाठी खेळावेच लागेल.’, असे सुनील गावसकर यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘टी-२० सामन्यात तुम्हाला २० षटके खेळावी लागतात. त्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा जास्त ताण पडत नाही. त्यामुळे बीसीसीआयने विश्रांती धोरणावर लक्ष द्यायला हवे”
विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत या खेळाडूंनी विश्रांती घेतल्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शिखर धवनकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी भारतासाठी ही एकमेव मालिका असणार आहे.
मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…
संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…
दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…
चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…
काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…
नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…