मुख्यमंत्री होण्याआधी ठाकरे चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कधी गेले ते दाखवा

Share

भाजपा आमदार नितेश राणे यांचा घणाघात

कणकवली : मुख्यमंत्री होण्याअगोदरचा चैत्यभूमीवर अभिवादन करतानाचा उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांचा एक तरी फोटो दाखवा. हाकेच्या अंतरावर असलेल्या महापौर बंगल्यावर तासनतास बसण्यास वेळ होता. पण कधी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होऊन अभिवादन करायला वेळ मिळाला नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय तिथे गेले. अन्यथा ते कधीही गेले नाहीत. याचे कारण देखील त्यांनी सांगावे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काय विचार आहेत? हे सुध्दा जाहीर करावे. अन्यथा आम्ही पुराव्यासकट उघडे पाडू, अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली.

संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असलेल्या सन्मानाबद्दल बोलू नये. आणि शक्य असेल तर संजय राऊत यांनी त्यांचे मालक उद्धव ठाकरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय होते? आणि त्यांनी संविधान कसे घडवलं ? याबद्दल थोडा लेक्चर द्यावा आणि मगच सकाळचे मनोरंजन करावं, असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत,उद्धव ठाकरेंना लगावला.

पुढे संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना,आ. नितेश राणे म्हणाले, पत्राचाळमधील मराठी माणूस तुम्हाला तरी माफ करणार आहे का?, मराठी माणसाचा आत्मा तुम्ही केव्हा शांत करणार. कारण तुमच्यामुळे त्यांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे. ती मराठी माणसं नाहीत का? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांच्या टीकेला प्रतिटोल्यातून आ.नितेश राणे यांनी उत्तर दिले. त्यामुळे पत्राचाळ मध्ये राहणाऱ्या मराठी माणसाबद्दल थोडी चिंता व्यक्त करा, बोलाआणि मगच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मराठी माणसाच्या नात्याबद्दल बोलण्याची हिंमत करा,असा इशारा देखील आ. नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

Recent Posts

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, दिनांक २२ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध चतुर्दशी सायंकाळी ०६.४७ नंतर पौर्णिमा शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती…

2 hours ago

मतदानाचा टक्का घसरला; कोण जबाबदार?

मुंबईत जे घडतं, त्याची चर्चा देशभर होते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक…

5 hours ago

नेहमी खोटे बोलणारे लोक! काय आहे मानस शास्त्रीय कारण?

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे काही लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकदा सातत्याने…

6 hours ago

घोषणा आणि वल्गना…

इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पूर्ण झालेत. मुंबईसह महाराष्ट्रात सर्व…

7 hours ago

IPL 2024: अय्यरच्या जोडीचा धमाका, कोलकाता आयपीएलच्या फायनलमध्ये

मुंबई: कोलकाता नाईट रायडर्सची अय्यर जोडीने कमाल केली. कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादला हरवत दिमाखात आयपीएलच्या…

8 hours ago

Reel बनवण्याच्या नादात तरूणाने १०० फूट उंचावरून पाण्यात मारली उडी, झाला मृत्यू

मुंबई: झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातून हैराणजनक बातमी समोर आली आहे. येथे रील बनवण्याच्या नादात तरुणाने १००…

9 hours ago