शिवसेनेने स्वत:चा फायद्यासाठी फेरफार केले

Share

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता शिवसेनेने स्वत:चा फायद्यासाठी चुकीचे फेरफार करून प्रभाग पाडल्याने मुंबईत काँग्रेस विरुद्ध सेना वाद पेटला आहे.

मुंबईत शिवसेनेकडून काँग्रेसचे खच्चीकरण केले जात असल्याचा काँग्रेसच्या माजी विरोधी पक्ष नेत्यांनी खळबळजनक आरोप केला आहे. माजी गटनेते रवी राजा यांनीही सेनेवर निशाणा साधला आहे. नगरविकास खात्याच्या निर्देशावरुनच प्रशासनाने मुंबईतील वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षणात फेरफार केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेनेने स्वत:चा फायदा करुन घेत काँग्रेसच्या जागांवर जाणून बुजून मोठे फेरफार केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईत काँग्रेसच्या २९ नगरसेवकांपैकी २१ नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण सोडतीत खालसा झालेत. माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा, आसिफ झकेरिया, सुफियान वनु, कमरजहाँ सिद्दीकी या मुंबईत काँग्रेसकडून चांगली कामगिरी करणा-या नगरसेवकांचे वॉर्ड आता अडचणीत सापडले आहेत.

वॉर्ड पुर्नरचनेपाठोपाठ वॉर्ड आरक्षण सोडतीतही काँग्रेसवर अन्याय आणि शिवसेनेचा फायदा झाल्याची काँग्रेसची भावना आहे.

यावर येत्या आठवड्यात मुंबईत चिंतन शिबीर घेऊन मुंबईतील काँग्रेस नेते चर्चा करणार असल्याचे समजते.

शिवसेनेकडून जाणिवपूर्वक मुंबईत काँग्रेसची ताकद वाढु नये याकरता प्रयत्न होत आहेत. त्यावर तोडगा काढू, असे महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले.

Recent Posts

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

1 hour ago

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

1 hour ago

IPL 2024: चेन्नई बाहेर जाण्याचे दु:ख पचवू शकला नाही अंबाती, कमेंट्री बॉक्समध्ये आले रडू

मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी…

3 hours ago

मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे…

4 hours ago

Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show)…

5 hours ago

Mobile SIM Card : तब्बल १८ लाख सिमकार्ड बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पण का?

नवी दिल्ली : देशात होणारी ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तब्बल…

5 hours ago