ठाणे : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकासआघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर देखील उतरल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली. दरम्यान, ठाणे शहरात बंद दरम्यान रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांना शिवसैनिकांकडून रस्त्यावरच मारहाण करण्यात आल्याचाही प्रकार समोर आला आहे.
ठाण्यामध्ये बंद पाळण्यासाठी शिवसैनिकांची एकप्रकारे दादागिरी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे रिक्षाचालकांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये उपमहापौरांचे पती पवन कदम यांचा देखील सहभाग दिसून आला. महाराष्ट्र बंद दरम्यान रिक्षा बंद ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतर रिक्षाचालकांना दमदाटी करत, मारहाण केल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र बंद असल्याने टीएमटी बससेवा बंद आहे, परिणामी नागरिकांना इच्छित स्थळी पोहचण्यासाठी रिक्षाचा वापर करावा लागत आहे. परंतु, शिवसैनिकांच्या या मारहाणीमुळे रिक्षाचालकांमध्येही दहशतीचे वातावरण पहायला मिळत आहे.
ठाण्यामधील जांभळीनाका परिसरात हा प्रकार घडला. या ठिकाणी अनेक शिवसैनिक काठीने रस्त्यावर चालणाऱ्या रिक्षांमधील रिक्षाचालकांना मारहाण करत होते व रिक्षा बंद करा, असे धमकावत होते. याशिवाय काही जणांच्या टोळक्याने शहरात फिरुन जी दुकानं उघडी होती ती बंद करण्यासाठी दमदाटी करण्यात आल्याचेही समोर आले आहे. अनेक दुकानांमध्ये शिवसैनिक घुसले होते व दुकान बंद करण्यास भाग पाडले. एकुणच ठाण्यामध्ये एक दहशतीचे वातावरण निर्माण करून हा बंद पाळण्यास भाग पाडला जात असल्याचे निदर्शनास आले. शिवसैनिकांच्या या कृतीचा अनेकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.
देशामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे दोन टप्पे पार पडले असून येत्या ७ मे रोजी निवडणुकीच्या तिसऱ्या…
माझे कोकण: संतोष वायंगणकर देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणूक प्रचार प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने…
मुंबई ग्राहक पंचायत: अभय दातार अर्जदाराला दिलेल्या कर्जापोटी त्याच्याकडून घेतलेली त्याच्या घराची मूळ कागदपत्रे नीट…
SRH vs RR: सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.…
काँग्रेसने ६५ वर्षात ८० वेळा घटना बदलली त्याचे काय? - नारायण राणे यांचा सवाल लांजा…
मुंबई: भारतात ऑनलाईन पेमेंटची(online payments) क्रेझ वेगाने वाढत आहे. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआय आल्यानंतर…