Monday, May 13, 2024
Homeब्रेकिंग न्यूजदिवाळीनंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये सात मोठे धमाके!

दिवाळीनंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये सात मोठे धमाके!

राज्यातील पीक पाण्यासह दुष्काळी परिस्थितीचाही घेतला आढावा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची दिवाळीनंतर आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील पीक पाण्यासह दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

राज्यातीस १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यात येणार आहे. तर बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी करण्यात आल्या आहेत.

▶️ राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले संक्षिप्त निर्णय

▶️ मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार

▶️ राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला

▶️ बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ

▶️ आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता

▶️ राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण

▶️ एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध ३४१ शिफारशी

▶️ राज्यातील पीक पाण्यासह दुष्काळी परिस्थितीचाही घेतला आढावा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -