Nashik : नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांचा वाढता रोष आणि अपघाती मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला आहे. येत्या सात दिवसांत नाशिक शहर खड्डेमुक्त झाले पाहिजे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. शनिवार (दि. १) पासून खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला सुरुवात होणार असून, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे पुढील २५ ते ३० वर्षांचा रस्त्यांचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचा दावा महाजन यांनी केला. ( Nashik News )
Nashik Rain Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट दिलेला होता. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ...
मंत्री गिरीश महाजनांचा प्रशासनाला दणका
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांमुळे झालेले मृत्यू आणि नागरिकांच्या संतापाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी महापालिकेतील स्थायी समितीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी रस्ते दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेत ठेकेदार आणि प्रशासनाला तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस महापौर हिमगौरी आहेर-आडके, स्थायी सभापती मच्छिंद्र सानप, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, आयुक्त मनीषा खत्री स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ( Nashik News )
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती दरवर्षी १ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने १ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राज्यभरात 'लेखन ...
खड्डे बुजविताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ठेकेदार कामे वेळेत करीत आहेत की नाही, याची तपासणी करा. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा. आवश्यक ती मदत शासन स्तरावर केली जाईल. रस्ते कामांच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे, अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेणे तसेच खड्डे बुजविताना मुरूम-मातीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ( Nashik News )
Nashik : भारतीय हवामान विभागाने नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठीआजही पावसाचा अलर्ट दिलेला आहे. पावसाचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ...
रस्ते कामात कुचराई करणाऱ्या ठेकेदारांना मोठा दंड
शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामात एमएनजीएलच्या खोदकामामुळे अडथळे येत असल्याची तक्रार आयुक्त मनीषा खत्री यांनी केली. कंपनीकडून कामांची पूर्वकल्पना महापालिकेला दिली जात नसून थेट रस्ते खोदले जात असल्याचे खत्री यांनी सांगितले. बैठकीसाठी एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते; मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांना शनिवारी बोलावण्याचे निर्देश मंत्री महाजन यांनी दिले. दरम्यान, रस्ते कामात कुचराई करणाऱ्या ठेकेदारांना सहा कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. ( Nashik News )
Jalgaon Crime News : बहिणीने कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्या समाजातील तरुणाशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मेहुण्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक ...
कोतकर कुटुंबाला नोकरी, शिक्षणाची जबाबदारी
खड्ड्यामुळे मृत्यू झालेल्या नीलेश कोतकर यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देताना मंत्री महाजन म्हणाले, "कोतकर कुटुंबीयांप्रती आमची सहानुभूती आहे. त्यांच्या पत्नीला नोकरी देण्यात येईल. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी महापौरांनी घेतली असून तिची पुढील जबाबदारी आपण स्वीकारू."खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
खड्डे बुजविण्याची मोहीम
रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाकडून खड्ड्यांची पाहणी सुरू करण्यात आली आहे. सातपूर-अंबडसह शहरातील सर्व भागांमध्ये दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असून, संपूर्ण शहर खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.






