Friday, June 26, 2026

Nashik : नाशिकला गुन्हेगारीचं ग्रहण ? जुन्या वादातून पुन्हा एका युवकाचा खून ; संशयित ताब्यात

Nashik : नाशिकला गुन्हेगारीचं ग्रहण ? जुन्या वादातून पुन्हा एका युवकाचा खून ; संशयित ताब्यात

Nashik Crime News : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तपोवन (Tapovan)  येथे सुटकेसमधील आढळलेला महिलेचा मृतदेह त्यानंतर कामगार कॉलनीतील घराच्या टेरेसवर गोणीत भरलेला २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह या दोन घटना ताज्या असतानाच नाशिकच्या देवळाली गाव येथे जुन्या वादातून एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज शुक्रवारी पहाटे घडली या घटनेननंतर परिसरात खळबळ उडाली आहे. (Nashik Crime News)

नेमकं प्रकरण काय ?

‎मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाल माळवे (वय ३६, रा. सुवर्ण सोसायटी, खोले मळा) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून आज शुक्रवारी पहाटे विशाल माळवे (Vishal Malve) याचा खून करण्यात आला. मयत विशाल माळवे आणि त्याचा मित्र अमोल गायकवाड रात्री एकत्र पार्टी करीत होते मात्र या दरम्यान दोघांमध्ये जुन्या वादातून वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत होऊन झाले आणि संशयित अमोल गायकवाड याने धारदार हत्याराने विशाल माळवे याच्यावर वार केले. दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालचा मृत्यू झाला. (Nashik Crime News)

‎घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. तर संशयित अमोल गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.दरम्यान खुनाची घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले याबाबत पुढील तपास उपनगर पोलिस करीत आहेत. (Nashik Crime News)

‎मात्र एकामागोमाग शहरात घडत असलेल्या खुनाच्या घटनेने नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिकच्या गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलाय का ? हा प्रश्न आता निर्मांण झाला आहे.

घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट

दरम्यान, नाशिक शहरातील पेठरोडवरील मेहेरधाम, शिवतेजनगर येथील ‘बालाजी रो-हाउस’मध्ये गुरुवारी (ता. २५) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास गॅस गळतीमुळे घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत घरात आग लागून सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. मात्र, घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, तसेच घरातील दुसरे भरलेले सिलिंडर बाहेर काढल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेनं परिसरात काही काळ भीतीचेवातावरण निर्माण झाले होते

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >