बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की, बांगलादेश संघ भारताला भेट देण्यास इच्छुक असून, या वर्षाच्या अखेरीस बांगलादेशमध्ये द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भारताला आमंत्रित केले आहे. सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग म्हणून भारत यावर्षी बांगलादेशचा दौरा करणार आहे, ज्यामुळे या घडामोडीचे महत्त्व आणखी वाढले आहे. यातून बांगलादेशातील नवीन प्रशासनाचा भारतासोबत संबंध प्रस्थापित करण्याचा आणि क्रिकेट संबंधांमधील अलीकडील तणावपूर्ण काळातून पुढे जाण्याचा प्रयत्न दिसून येतो.
विशेष म्हणजे बांगलादेशने तमीम इक्बाल यांची देशाचे सर्वात तरुण क्रिकेट प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाला झाली संभाव्य नुकसानीची जाणीव :
मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्हा एकदा आयपीएलच्या सुरुवातीपासून दुखापतीमुळे अनुपलब्ध असलेल्या परदेशी क्रिकेटपटूंना लक्ष्य ...
वास्तविक पाहता, बांगलादेशच्या नवनिर्वाचित सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय क्रीडा परिषदेने बुलबुल यांच्या नेतृत्वाखालील बोर्ड बरखास्त करून त्या जागी ११ सदस्यीय अंतरिम समितीची स्थापना केली. नवीन निवडणुका होईपर्यंत ही समिती बोर्डाच्या कामकाजावर देखरेख ठेवेल. या तदर्थ समितीच्या प्रमुखपदी बांगलादेशचे माजी कर्णधार तमीम इक्बाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Bangladesh Cricket Board)





