- एआय समिटमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट
नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय समिट २०२६' मध्ये महाराष्ट्र राज्याने आपल्या तंत्रज्ञानस्नेही धोरणांचा आणि प्रगत उपक्रमांचा प्रभावी ठसा उमटवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समिटमधील 'महाराष्ट्र पॅव्हेलियन'ला भेट देऊन राज्यातील विविध एआय प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या नियोजनासाठी विकसित 'कुंभदूत' या एआय-आधारित ॲपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
'कुंभदूत ॲप' :
नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय समिट २०२६' मध्ये महाराष्ट्र राज्याने आपल्या तंत्रज्ञानस्नेही धोरणांचा आणि प्रगत उपक्रमांचा प्रभावी ठसा उमटवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी २० जानेवारी रोजी या समिटमधील 'महाराष्ट्र पॅव्हेलियन'ला भेट देऊन राज्यातील विविध एआय प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या नियोजनासाठी विकसित 'कुंभदूत' या एआय-आधारित ॲपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
'हाय-टेक' सारथी :
यावेळी अनावरण करण्यात आलेले कुंभदूत ॲप आगामी महाकुंभमेळ्यासाठी 'हाय-टेक सारथी' म्हणून ओळखले जाईल. लाखो भाविकांचे व्यवस्थापन, गर्दीचे नियंत्रण आणि आपत्कालीन सेवांच्या समन्वयासाठी हे महत्वपूर्ण ठरणार आहे. या ॲपमुळे भाविकांना रिअल-टाइम माहिती मिळण्यासोबतच प्रशासनाला सुरक्षेच्या दृष्टीने अचूक नियोजन करणे सुलभ होणार आहे. डिजिटल इंडियाच्या ध्येयाला गती देत महाराष्ट्र राज्य आता एआय क्रांतीमध्ये आघाडीवर असल्याचे या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
🔸CM Devendra Fadnavis launched the app ‘Kumbhdoot: AI Agent for Every Pilgrimage’ at the ‘India AI Impact Summit 2026’ in New Delhi. The app has been developed to provide guidance and assistance to devotees attending the upcoming Simhastha Kumbh Mela in Nashik. Minister Adv.… pic.twitter.com/t0OrqZSnRs
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 20, 2026
यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मत्स व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागीय आयुक्त नाशिक प्रवीण गेडाम यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हे कुंभदूत ॲप आगामी महाकुंभमेळ्यासाठी 'हाय-टेक सारथी' म्हणून ओळखले जाईल. लाखो भाविकांचे व्यवस्थापन, गर्दीचे नियंत्रण आणि आपत्कालीन सेवांच्या समन्वयासाठी हे महत्वपूर्ण ठरणार आहे. या ॲपमुळे भाविकांना रिअल-टाइम माहिती मिळण्यासोबतच प्रशासनाला सुरक्षेच्या दृष्टीने अचूक नियोजन करणे सुलभ होणार आहे. डिजिटल इंडियाच्या ध्येयाला गती देत महाराष्ट्र राज्य आता एआय क्रांतीमध्ये आघाडीवर असल्याचे या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.







