‘या’ सहा देशी क्रीडा प्रकारांची खेलो इंडिया योजनेत निवड

Share

नवी दिल्ली : भारताच्या अनेक भागात स्थानिक संस्कृती आणि परंपरेनुसार अनेक देशी क्रीडा प्रकार खेळले जातात. “क्रीडाक्षेत्र’ हा राज्याचा विषय असल्याने, देशातील अशा देशी खेळांना प्रोत्साहन देण्याची आणि अशा खेळांच्या विकासासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची प्राथमिक जबाबदारी, संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची आहे. राज्यांच्या या प्रयत्नांना केंद्र सरकार पाठबळ देते.

केंद्रीय क्रीडा मंत्रालय केंद्रीय क्षेत्रावरील एक योजना (Khelo India scheme) खेलो इंडिया- क्रीडा विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (खेलो इंडिया योजना) राबवत आहे. या अंतर्गत, एक उपक्रम, “ग्रामीण आणि देशी/ आदिवासी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन” अशा नावाने राबवला जातो. देशी खेळांना याअंतर्गत प्रोत्साहन दिले जाते. मल्लखांब, कल्लरीपयट्टू, गटका, थांग-था, योगासने आणि सीलबम अशा पारंपरिक देशी खेळांची यासाठी निवड करण्यात आली आहे. या खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण, उपकरण सहाय्य, प्रशिक्षकांची नेमणूक आणि शिष्यवृत्ती यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय, मल्लखांब, कल्लरीपयट्टू, गटका, थांग-था आणि योगासने हे खेळ, नुकत्याच हरियाणातील पंचकुला इथे झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतही समाविष्ट करण्यात आले होते.

अशी माहिती, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात दिली.

Recent Posts

कमी पाणी प्यायल्यामुळे होऊ शकतो किडनीचा हा गंभीर आजार

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराच्या हिशेबाने भरपूर प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे.…

45 mins ago

Google Pixel 8a भारतात लाँच, ही आहे किंमत

मुंबई: Google Pixel 8a भारतात लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये अनेक दमदार फीचर्स, जबरदस्त…

2 hours ago

DC vs RR: सॅमसंगचा वादग्रस्त झेल, दिल्लीसमोर राजस्थान फेल…

DC vs RR: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगलेला सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.…

9 hours ago

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शांततेत मतदान

महायुतीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा उत्साह सिंधुदुर्ग : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात…

11 hours ago

देशात तिसऱ्या टप्प्यात ६१ टक्के तर महाराष्ट्रात ५४.०९ टक्के मतदान

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. यामध्ये १२ राज्ये आणि…

11 hours ago

कडिपत्ता खाण्याने दूर होतात हे आजार

मुंबई: कडिपत्त्याचे सेवन खाण्यापासून ते अनेक औषधांमध्ये केला जातो. यातील अनेक औषधीय गुण अनेक आजारांमध्ये…

11 hours ago