शिवराज्याभिषेक सोहळा! स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्णक्षण

6 जून 1674 रायगड किल्ल्यावर  छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला.

रायगडाची निवड रायगड हा स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला गेला आणि याच ठिकाणी ऐतिहासिक सोहळा पार पडला.

स्वराज्याला सार्वभौम मान्यता राज्याभिषेकामुळे मराठा साम्राज्याला स्वतंत्र राज्य म्हणून ओळख मिळाली.

वैदिक विधी काशीचे विद्वान गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली वैदिक पद्धतीने राज्याभिषेक झाला.

पवित्र अभिषेक सप्तसिंधू आणि विविध तीर्थक्षेत्रांतील पवित्र जलाने महाराजांचा अभिषेक करण्यात आला.

छत्रपती पदवी राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी अधिकृतपणे 'छत्रपती' ही पदवी धारण केली.

नव्या युगाची सुरुवात स्वराज्याच्या स्वतंत्र प्रशासन आणि चलन व्यवस्थेला अधिक बळ मिळाले.

भव्य सोहळा हजारो मान्यवर, सरदार, विद्वान आणि प्रजेच्या उपस्थितीत उत्साहात सोहळा पार पडला.

स्वराज्याचा विजय, शिवराज्याभिषेक हा केवळ राज्याभिषेक नव्हता, तर हिंदवी स्वराज्याच्या स्वाभिमानाचा विजय होता.