Nashik News : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध धरणांमधून शनिवारी देखील पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 8, 370 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठावरील नागरिकांनी, शेतकर्यांनी आणि व्यावसायिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
https://prahaar.in/2026/07/25/maharashtra-monsoon-update-heavy-rainfall-warning-for-the-state-for-the-next-two-to-three-days/
गंगापूर धरणासह जिल्ह्यातील अन्य धरणांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधार्यातून सर्वाधिक 71 हजार 497 क्युसेक पाण्याचा प्रवाह पुढे सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या खालच्या प्रवाहातील गावांनी विशेष सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
https://prahaar.in/2026/07/25/then-education-officer-arrested-in-dhule-in-connection-with-the-%e2%82%b9160-crore-shalarth-scam/
धरण विसर्ग (क्युसेकमध्ये)
गंगापूर – 8, 370
कादवा – 13, 716
गौतमी गोदावरी – 500
भावली – 2152
दारणा – 19312
नांदूर मध्यमेश्वर बंधारा – 71,036
भाम – 6359