Nashik : गंगापूर धरणातून (Gangapur Dam) सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून, गुरुवार (23 जुलै) सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग 6,354 क्यूसेक्सवरून 7,413 क्यूसेक्स करण्यात आला आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने याबाबत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. (Increase in discharge from Gangapur Dam)
https://prahaar.in/2026/07/23/mumbai-water-supply-relief-from-heavy-rainfall-water-stock-in-the-7-reservoirs-supplying-mumbai-reaches-69-74/
गंगापूर धरणातून विसर्गात वाढ
पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजता 1,059 क्यूसेक्सने विसर्ग वाढविण्यात आला आहे. तसेच, परिसरातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काळात विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, नदीपात्रात उतरू नये तसेच नदीकाठावर ठेवलेले साहित्य, जनावरे आणि इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिका, जिल्हा प्रशासन (District Administration) तसेच संबंधित विभागांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून कोणताही धोका पत्करू नये, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाने केले आहे
https://prahaar.in/2026/07/23/ban-on-assembly-in-mumbai-from-today-until-august-6/
मोसम नदी काठी असणाऱ्यांनाही सावधानतेचा इशारा
त्यासोबतच हरणबारी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना तसेच मोसम नदी काठी असणाऱ्या सर्व महानुभव यांना सावधान तेचा इशारा देण्यात आला आहे, हरणबारी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडवा ६२२१ ने विसर्ग चालू आहे . तेंव्हा पाण्याचा प्रवाह खूपच प्रचंड असल्याने नदी काठी राहणाऱ्या तसेच आपले सामान नदीकाठी असणाऱ्या शेतकरी / इतर लोकांनी जबाबदारीने आपले सामान काढून घ्यावे. तसेच मालेगाव महापालिका (Malegaon Municipal Corporation) हद्दीतील मोसम नदीकाठी असणाऱ्या सर्व लोकांनी आपले चीजवस्तू काढून घेण्यात यावा आणि इतरांना देखील या बाबत सतर्कतेचा इशारा द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.