रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून गोव्याहून मुंबईकडे परतणाऱ्या एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा रेस्ट हाऊसजवळ बुधवारी (१५ जुलै) सकाळी झालेल्या या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Mumbai-Goa Highway Accident)
डंपरला कारची जोरदार धडक :
माहितीनुसार, मुंबईतील आग्रीपाडा परिसरात राहणारे हे कुटुंब गोव्यातून फिरून क्रेटा कारने मुंबईकडे परतत होते. सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास लांजा रेस्ट हाऊसजवळ त्यांच्या कारने पुढे जात असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की क्रेटा कारचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात कारमधील दोन महिला आणि एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Mumbai-Goa Highway Accident)
https://prahaar.in/2026/07/15/mumbai-fda-raid-violation-of-food-safety-norms-proves-costly-major-action-taken-against-three-famous-mumbai-restaurants/
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू :
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Mumbai-Goa Highway Accident)
https://prahaar.in/2026/07/15/rent-boyfriend-trend-the-rent-boyfriend-trend-arrives-in-india-you-can-hire-a-boyfriend-by-the-hour-what-is-this-all-about/
परतीचा प्रवास ठरला अखेरचा :
गोव्यातील सहल आटोपून आनंदाने मुंबईकडे निघालेल्या या कुटुंबावर काही क्षणांतच काळाने घाला घातला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलीस अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास करत आहेत. (Mumbai-Goa Highway Accident)