Home क्रीडा IND vs AUS : ऑस्ट्रेलियाकडून पराभवानंतर भारताचं टी-20 वर्ल्डकपमधील आव्हान संपलं; ‘या’ चुका ठरल्या निर्णायक

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाकडून पराभवानंतर भारताचं टी-20 वर्ल्डकपमधील आव्हान संपलं; ‘या’ चुका ठरल्या निर्णायक

0
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाकडून पराभवानंतर भारताचं टी-20 वर्ल्डकपमधील आव्हान संपलं; ‘या’ चुका ठरल्या निर्णायक
ICC Womens World Cup

आयसीसी (ICC) महिला टी-20 (T20) वर्ल्डकपमध्ये (World Cup) ऑस्ट्रेलियाने (Australia) भारताचा ६ विकेट्सनी पराभव करत स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आणलं. या विजयासह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांनी सेमीफायनलमध्ये (Semi-final) प्रवेश केला. मात्र, भारताच्या बाहेर पडण्यामागे केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव नव्हे, तर सहा दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या महत्त्वाच्या चुका देखील कारणीभूत ठरल्या. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १७० धावा उभारल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने ५६ धावा केल्या, तर स्मृती मंधानाने ३८, शेफाली वर्माने ३४ आणि जेमिमा रॉड्रिग्सने ३४ धावांचे योगदान दिले.

१७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. रेणुका सिंहने जॉर्जिया वॉलला अवघ्या ४ धावांवर बाद केले. त्यानंतर श्री चरणीने फोबी लीचफिल्डला २४ धावांवर आणि बेथ मुनीला २२ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ६८ अशी केली. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा बळावल्या होत्या.

https://prahaar.in/2026/06/29/ind-vs-ire-t20i-india-suffers-a-shock-defeat-in-the-t20-series-against-ireland-where-did-team-india-go-wrong/

मात्र, एलिस पेरी आणि अॅशले गार्डनर यांनी चौथ्या विकेटसाठी जवळपास १०० धावांची भागीदारी (Partnership) करत सामना भारताच्या हातातून हिसकावून घेतला. पेरीने ५६ धावा केल्या, तर गार्डनर ५३ धावांवर नाबाद राहिली. अखेरीस ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्स राखून विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चुका ठरल्या महाग

भारताच्या स्पर्धेतील बाहेर पडण्यामागे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पराभवही तितकाच महत्त्वाचा ठरला. त्या सामन्यात भारताने दिलेल्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मॅरिझान कॅपने ८१ धावांची नाबाद खेळी करत दक्षिण आफ्रिकेला ६ विकेट्सनी विजय मिळवून दिला.

या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी (Fielders) मॅरिझान कॅपचे तब्बल तीन झेल (Catch) सोडले. १०व्या, १३व्या आणि १७व्या षटकात मिळालेल्या संधी भारताला साधता आल्या नाहीत. या तीनपैकी एक जरी झेल पकडला गेला असता, तर सामन्याचा निकाल बदलू शकला असता.

याच पराभवामुळे भारताला गुणतालिकेत (Points Table) मोठा फटका बसला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली लढत देऊनही सेमीफायनलचे (Semi-final) तिकीट मिळवता आले नाही. त्यामुळे सहा दिवसांपूर्वी झालेल्या क्षेत्ररक्षणातील (Fielding) चुका अखेर भारताच्या टी-20 (T20) वर्ल्डकप (World Cup) मोहिमेसाठी निर्णायक ठरल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here