– मंत्री नितेश राणे यांचा इशारा; नियम मोडला तर ‘बकरी ईद’ तुरुंगात
मुंबई : “हिंदुराष्ट्रात” सार्वजनिक रस्त्यांवर नमाज पठण खपवून घेतले जाणार नाही. रस्ते हे नागरिकांना चालण्यासाठी आणि वाहतुकीसाठी आहेत. जर कुणी नियमांचे उल्लंघन करून राज्यात शरिया कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची पुढची ‘बकरी ईद’ तुरुंगातच साजरी होईल”, असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी दिला. मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होई. (Nitesh Rane)
https://prahaar.in/2026/05/25/nitesh-rane-revenue-of-crores-from-unused-ships-minister-nitesh-rane-accelerates-ship-recycle-policy/
https://prahaar.in/2026/05/25/maharashtra-state-jawahar-bal-bhavans-renovated-building-inaugurated-by-cm-devendra-fadnavis/
‘वंदे मातरम’ म्हणा, अन्यथा पाकिस्तानात जा!
https://prahaar.in/2026/05/25/nashik-crime-shocking-revelation-about-the-suspected-accused-in-the-liquor-party/
…तर थेट मोक्का लागणार :
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या नव्या शासन आदेशाचा संदर्भ देत राणे म्हणाले, “आमच्या सरकारने नुकताच एक जीआर काढला आहे. त्यानुसार कोणत्याही प्रकारची गोहत्या किंवा बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्यास थेट ‘मोक्का’ लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे पूर्ण अधिकार दिले आहेत. या निर्णयाची १०० टक्के अंमलबजावणी सरकार करणार आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मानणाऱ्या या हिंदुराष्ट्रात कुणी नियम मोडले किंवा शरिया कायदा आणण्याचा प्रयत्न केला, तर ते थेट जेलची हवा खाताना दिसतील आणि त्यांची पुढची बकरी ईद तुरुंगातच जाईल,” असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला. (Nitesh Rane)