दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानची भारताने आता चारही बाजूंनी कोंडी केली आहे. सिंधू नदीच्या पाण्यावर निर्बंध आणल्यानंतर भारताने व्यापारी स्तरावरही पाकिस्तानला मोठा झटका दिला असून दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापार जवळपास पूर्णपणे ठप्प झाला आहे. विशेष म्हणजे, भारताकडून आयातीवर बंदी असतानाही औषधनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी पाकिस्तानला आजही भारतावरच अवलंबून राहावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या सर्व आयातीवर अधिकृत बंदी :
https://prahaar.in/2026/05/07/iran-america-war-progress-in-iran-america-talks-possibility-of-a-ceasefire-agreement-soon/
भारत-पाकिस्तान व्यापार शून्यावर :
एकेकाळी भारत-पाकिस्तान व्यापार २.४१ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला होता. मात्र, सतत वाढणारा तणाव, सीमापार दहशतवाद आणि भारताच्या कठोर धोरणांमुळे हा व्यापार २०२४ मध्ये १.२ अब्ज डॉलरपर्यंत घसरला. आता नव्या निर्बंधांनंतर हा आकडा जवळजवळ शून्यावर पोहोचल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तानमधील औषध उद्योग संकटात :
दरम्यान, State Bank of Pakistan च्या आकडेवारीनुसार, जुलै ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत पाकिस्तानने भारताकडून ३६.६ दशलक्ष डॉलरचा माल आयात केला. विशेष म्हणजे, या आयातीत केवळ औषधनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा समावेश होता. पाकिस्तानमधील औषध उद्योग सध्या गंभीर संकटातून जात असून अनेक औषध उत्पादक कंपन्यांना उत्पादन बंद करण्याची वेळ आल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तान वैद्यकीय आर्थिक संकटात :
पाकिस्तानमधील रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध राहावीत या मानवतावादी दृष्टिकोनातून भारताने काही मर्यादित सवलती कायम ठेवल्या आहेत. मात्र, औषधांच्या कच्च्या मालासाठीही भारतावर अवलंबून राहावे लागत असल्याने पाकिस्तानची आर्थिक आणि औद्योगिक कमकुवतता पुन्हा एकदा उघड झाली आहे.
https://prahaar.in/2026/05/07/chhagan-bhujbal-i-am-not-insistent-on-rajya-sabha-whatever-decision-the-party-takes-will-be-final-chhagan-bhujbal/
भारतीय औषध मिळवण्यासाठी इतर देशांची मदत :
पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या :
केवळ औषध क्षेत्रच नव्हे, तर कापूस, रसायने, सिमेंट, कृषी उत्पादनं आणि विविध औद्योगिक वस्तूंसाठीही पाकिस्तान मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून होता. भारताने व्यापार बंद केल्यानंतर पाकिस्तानातील अनेक उद्योग अडचणीत आले असून उत्पादन खर्च वाढल्याने निर्यातीवरही परिणाम झाला आहे.
दुसरीकडे भारताकडे होणारी पाकिस्तानची निर्यातही जवळपास संपुष्टात आली आहे. २०१९ मध्ये भारताला पाकिस्तानकडून ५४७.५ दशलक्ष डॉलरची निर्यात होत होती. मात्र, २०२४ मध्ये हा आकडा अवघ्या ४ लाख ८० हजार डॉलरपर्यंत खाली आला. भारताने पाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंध जवळपास पूर्णपणे तोडल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
https://prahaar.in/2026/05/07/mamata-banerjees-trouble-will-increase-10-mlas-absent-in-tmc-meeting/
अशा परिस्थितीतही पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरूच :
राजकीय विश्लेषकांच्या मते, एका बाजूला आर्थिक संकट, महागाई, औषधटंचाई आणि उद्योगधंद्यांची पडझड अशा समस्यांनी पाकिस्तान त्रस्त असताना दुसऱ्या बाजूला भारतविरोधी प्रचार सुरू ठेवणे, ही पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांची जुनी रणनीती असल्याचे दिसून येते. मात्र, भारताने आर्थिक आणि व्यापारी स्तरावर घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तानवर मोठा दबाव निर्माण झाला असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.