नवी दिल्ली : आजघडीला गंगोत्रीपासून ते गंगासागरपर्यंत कमळ फुलल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केले. देशातील ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची निकाल जाहीर झाल्यानंतर ते सोमवारी संध्याकाळी दिल्लीच्या भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.
https://prahaar.in/2026/05/04/devendra-fadnavis-the-victory-in-west-bengal-belongs-to-every-nationalist-citizen-of-the-country/
https://prahaar.in/2026/05/04/bjp-secures-absolute-power-in-west-bengal-mamata-banerjee-defeated-in-assembly-elections/
ते पुढे म्हणाले, “२०१३ मध्ये भाजपने मला पंतप्रधानपदाचा (PM Narendra Modi) उमेदवार म्हणून जबाबदारी दिली आणि मी काशी येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलो असताना पत्रकारांनी मला घेरले होते. त्या वेळी माझ्या मनातून सहज एक भावना व्यक्त झाली आणि मी म्हणालो होतो की मी स्वतःहून आलो नाही, मला कोणी पाठवलेले नाही, मला माता गंगाने बोलावले आहे. आणि आज प्रत्येक क्षणी मला जाणवते की माता गंगेचा आशीर्वाद सतत आपल्यावर राहिला आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळेच कमळ फुलले आहे, तसेच मतदारांनी जगाला दाखवून दिले की भारताला लोकशाहीची जननी का म्हटले जाते. त्यांनी म्हटले की जय-पराजय हा लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेचा नैसर्गिक भाग आहे. परंतु पाच राज्यांतील जनतेने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे की भारताला ‘मदर ऑफ डेमोक्रसी’ का म्हटले जाते. लोकशाही आमच्यासाठी केवळ एक व्यवस्था नाही, ती आमच्या रक्तात वाहणारी संस्कृती आहे. आज केवळ भारताची लोकशाहीच जिंकलेली नाही, तर भारताचे संविधान, संवैधानिक संस्था आणि लोकशाही प्रक्रिया यांचाही विजय झाला आहे. (PM Narendra Modi)
https://prahaar.in/2026/05/04/government-will-not-rest-until-the-monster-from-nasrapur-is-sent-to-the-gallows/