जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढून १५ वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी सकाळी रामनगर परिसरातील कागोट गावाजवळ घडला. एका प्रवासी बसचा डोंगराळ रस्त्यावर ताबा सुटल्याने ती खोल दरीत कोसळली.
https://prahaar.in/2026/04/20/ipl-2026-punjabs-fifth-consecutive-victory-dominance-in-points-table-continues/
घटनेनंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. प्रशासन आणि पोलिसांच्या पथकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पोहोचवले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. परिसरात शोककळा पसरली असून प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.
अपघातानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी उधमपूरच्या उपायुक्तांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि गंभीर जखमींना एअरलिफ्ट करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती दिली. मदत व बचावकार्य वेगाने सुरू असून प्रशासनाशी सतत संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.