Home क्रीडा IPL IPL 2026 RCB vs CSK : ‘डोसा-इडली-सांबर-चटणी’ गाण्यावरून संतापली चेन्नई; केली बीसीसीआयकडे तक्रार

IPL 2026 RCB vs CSK : ‘डोसा-इडली-सांबर-चटणी’ गाण्यावरून संतापली चेन्नई; केली बीसीसीआयकडे तक्रार

0
IPL 2026 RCB vs CSK : ‘डोसा-इडली-सांबर-चटणी’ गाण्यावरून संतापली चेन्नई; केली बीसीसीआयकडे तक्रार
RCB vs CSK

– जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

आयपीएल २०२६ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील सामना मैदानापुरताच मर्यादित राहिला नाही, तर आता तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ५ एप्रिल रोजी बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आलेल्या एका गाण्यावरून सीएसकेने थेट बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.

सीएसकेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या डावापूर्वी “डोसा, इडली, सांबार, चटणी” हे गाणे वाजवून संघाची खिल्ली उडवण्यात आली. यामुळे खेळाडूंचा अपमान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

डीजेच्या वर्तनावरही आक्षेप :

वृत्तानुसार, आयपीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीएसकेची तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली असून, या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. सीएसकेचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनीही नाराजी व्यक्त करत सांगितले की, स्टेडियममधील डीजेचे काम प्रेक्षकांचे मनोरंजन करणे असते, परंतु खेळाडूंवर टिप्पणी करणे किंवा त्यांची चेष्टा करणे हे खेळाच्या भावनेविरुद्ध आहे.

https://prahaar.in/2026/04/13/hardik-pandya-hat-trick-in-mumbais-defeat-hardik-pandyas-captaincy-criticized-by-veteran-players-and-everyone-around/

‘डोसा-इडली’ गाण्यावरून आधीही वाद :

हे गाणे याआधीही चर्चेत राहिले आहे. संगीतकार गणा अप्पू यांच्याशी संबंधित असलेले हे गाणे RCB-CSK सामन्यांदरम्यान वारंवार वादाचे कारण ठरले आहे. गेल्या वर्षी यष्टिरक्षक जितेश शर्मा याने हे गाणे गातानाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता.

‘सदर्न डर्बी’त वाढता तणाव :

चेन्नई आणि बंगळूर यांच्यातील सामने आता ‘सदर्न डर्बी’ म्हणून ओळखले जातात आणि ही स्पर्धा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. विशेष म्हणजे, 2024 पासून RCB ने CSK विरुद्ध सलग चार सामने जिंकले आहेत, ज्यामुळे दोन्ही संघांमधील तणाव आणखी वाढला आहे.

BCCI च्या निर्णयाकडे लक्ष :

या संपूर्ण प्रकरणावर आता BCCI आणि IPL गव्हर्निंग कौन्सिल काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वादावर पुढे काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.