– मंत्री नितेश राणे; जयंत पाटील-मुख्यमंत्र्यांच्या एकत्र प्रवासावर भाष्य
मुंबई : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत प्रवास करण्याची आणि त्यांचा सहवास लाभण्याची इच्छा राजकीय वर्तुळातील प्रत्येकाचीच असते. ‘देवाभाऊं”चा सहवास लाभणे म्हणजे स्वतःचे भविष्य घडवण्यासारखे आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या प्रवासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या मनात योग्य विचार येतील”, अशी प्रतिक्रिया राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सोमवारी दिली.
https://prahaar.in/2026/08/10/nitesh-rane-manoj-jaranges-point-is-valid-but-his-language-is-inappropriate/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी रविवारी मुंबई ते कोल्हापूर असा एकाच विमानाने एकत्र प्रवास केला. या अनपेक्षित एकत्र प्रवासामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रवासावर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खुसखुशीत प्रतिक्रिया दिली.
https://prahaar.in/2026/08/10/devendra-fadnavis-why-did-the-fcra-bill-sting-some-people-in-the-us/
नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या गाडीत किंवा विमानात बसण्याची इच्छा सर्वांचीच असते. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या वरिष्ठ आणि अभ्यासू नेत्यासोबत प्रवास मिळणे ही राजकीय दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास केला असेल, तर त्यातून त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी योग्य विचार येतील”, अशी प्रतिक्रिया त्यांनी (Nitesh Rane) दिली.