स्थायी समितीने व्यक्त केली तीव्र नाराजी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक पुलांची तसेच उड्डाणपुलांची कामे सुरु असून या अंतर्गत रे रोड येथील रेल्वे लाईनवरील पूल तोडून त्यांच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कंत्राट कामांच्या खर्चात वाढ झालेली आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत आला असता प्रत्यक्षात सदस्यांच्या प्रश्नांचे निरसर करण्यासाठी पूल विभागाचे अधिकारीच उपस्थित नसल्याने प्रशासनाचा निषेध करत हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला आहे. ( Reay Road Railway Bridge)
https://prahaar.in/2026/08/07/water-cut-news-water-supply-cut-in-bandra-east-to-andheri-east-areas-this-coming-tuesday-and-wednesday/
मुंबईतील रे रोड येथील रेल्वे लाईनवरील पूल (आरआेबी) पाडून त्यांच्या पुनर्बांधणीचे काम महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व रेल्वे संयुक्त उपक्रम असलेल्या संस्थेद्वारे करण्याच्या कामामध्ये फेरफार करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीसमोर ८ जुलै २०२६ रोजी सादर करण्यात आला होता. या पुलाच्या कामांसाठी १९६.०७ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. परंतु आता त्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे अतिरिक्त २३.७५ कोटी रुपयांचा खर्च वाढला गेला आहे. २१९.८३ कोटी रुपयांच्या एकूण कंत्राट कामाच्या या प्रस्तावावर उबाठाचे रमाकांत रहाटे यांनी मागील बैठकीत काही मुद्दे उपस्थित केले होते. (Railway Bridge Work)
परंतु गुरुवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी पुकारण्यात आला असता रहाटे यांनी या संबंधित पुलांचे अधिकारी कोण आहेत का याबाबत विचारणा केली आहे.
यापुलाच्या खर्च वाढवण्यास मंंजुरी दिली जात असली तरी येथील पदपथ तसेच इतर सुख सुविधांची माहिती देण्यात यावी. तिथून गळती होत आहे, मग यासर्वांबाबतची माहिती मिळणे आवश्यक आहे. परंतु या पूल विभागाचे अधिकारीच उपस्थित नसल्याने सभागृहनेते गणेश खणकर यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची उपसूचना मांडली. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी या दप्तरी दाखल करण्यात येत असल्याचे सांगितले. ( Maharashtra News)