मुंबई : पालघर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहभागातून विकसित होत असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याचा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांनी गुरुवारी सखोल आढावा घेतला. महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे, बंदरांची क्षमता वाढवणे आणि राज्याला जागतिक सागरी व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
https://prahaar.in/2026/07/30/major-crackdown-by-raigad-police-on-cyber-gang-%e2%82%b935-crore-fraud-exposed
View this post on Instagram
मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी जवाहरलाल नेहरू(Jawaharlal Nehru) पत्तन प्राधिकरणाच्या (JNPA) उरण येथील मुख्य प्रशासकीय भवनाला भेट देऊन बंदराच्या विविध विकासकामांचा तसेच भविष्यातील विस्तार आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जेएनपीएची विद्यमान बंदर क्षमता, आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास, पर्यावरणपूरक व्यवस्थापन आणि मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी या विषयांवर राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. यासोबतच, जेएनपीएमार्फत आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांबाबतही बैठकीत सविस्तर मंथन झाले.
https://prahaar.in/2026/07/30/cwg-2026-three-indian-javelin-throwers-including-neeraj-in-the-final/
वाढवण बंदर प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या सागरी वाहतुकीला आणि लॉजिस्टिक नेटवर्कला मोठी गती मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि मल्टीमोडल लॉजिस्टिक नेटवर्क अधिक सक्षम करण्याबाबत विविध उपाययोजनांवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. या बैठकीला जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाळ, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, जेएनपीएच्या सचिव तथा महाव्यवस्थापक मनीषा जाधव यांच्यासह जेएनपीए आणि महाराष्ट्र सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.