Home देश India-Pakistan POK : अमेरिकी वृत्तपत्रात ‘पाकिस्तानी काश्मीर’ असा उल्लेख, भारताने नोंदवला तीव्र आक्षेप

India-Pakistan POK : अमेरिकी वृत्तपत्रात ‘पाकिस्तानी काश्मीर’ असा उल्लेख, भारताने नोंदवला तीव्र आक्षेप

0
India-Pakistan POK : अमेरिकी वृत्तपत्रात ‘पाकिस्तानी काश्मीर’ असा उल्लेख, भारताने नोंदवला तीव्र आक्षेप

नवी दिल्ली : अमेरिकेतील भारतीय दूतावासाने एका अमेरिकन वर्तमानपत्राच्या वृत्ताच्या मथळ्यावर तीव्र आक्षेप नोंदवत ‘पाकिस्तानी काश्मीर’ असा कोणताही प्रदेश अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले आहे. दूतावासाने म्हटले आहे की, योग्य उल्लेख ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके)’ असा आहे. (India-Pakistan POK)

सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना भारतीय दूतावासाने अमेरिकन वृत्तपत्राचा मथळा दिशाभूल करणारा आणि वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे म्हटले. दूतावासाने स्पष्ट केले की, ‘पाकिस्तानी काश्मीर’ अशी कोणतीही स्वतंत्र ओळख किंवा भौगोलिक एकक नाही.

https://prahaar.in/2026/07/30/iran-america-war-us-strikes-iranian-military-bases-following-attack-in-jordan/

भारताने पुन्हा एकदा ठाम भूमिका मांडत जम्मू-काश्मीर आणि लदाख हे देशाचे अविभाज्य व अभिन्न भाग असल्याचे सांगितले आहे. भारताच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने या प्रदेशातील काही भागांवर बेकायदेशीर कब्जा केला असून तेथील नागरिकांना दडपशाही आणि हिंसाचाराचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, अमेरिकन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, जूनच्या सुरुवातीपासून झालेल्या हिंसाचारात निदर्शक, सुरक्षा दलाचे जवान आणि सामान्य नागरिकांसह किमान ३० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. हे वृत्त स्थानिक अधिकारी आणि स्वतंत्र मूल्यांकनांच्या आधारे प्रकाशित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. (India-Pakistan POK)

https://prahaar.in/2026/07/30/soanm-wangchuk-sonam-wangchuk-who-was-on-a-hunger-strike-against-the-modi-government-has-now-praised-the-modi-government-know-what-exactly-happened/

वृत्तानुसार, जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी या संघटनेने तथाकथित प्रादेशिक विधानसभेतील १२ वादग्रस्त जागांच्या मुद्द्यावर गेल्या महिन्यापासून आंदोलन सुरू ठेवले आहे. या जागांचा वापर आपल्या पसंतीचे सरकार स्थापन करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

भारताने म्हटले आहे की, पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन हे आर्थिक शोषण, मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवणे आणि प्रशासकीय दडपशाही यांसारख्या कारणांमुळे होत आहे. भारताने पुन्हा स्पष्ट केले की पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असून त्यावर पाकिस्तानने बेकायदेशीर कब्जा केला आहे. (India-Pakistan POK)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here