पंढरपूर : आषाढी वारी (Ashadhi Wari) निमित्त पंढरपूर (Pandharpur) येथे आलेल्या एका भाविकाला अचानक छातीत त्रास (Chest Pain) जाणवू लागल्याने त्याला तातडीने उपचार देत एअर ॲम्ब्युलन्स (Air Ambulance) द्वारे सोलापूर (Solapur) येथे हलवण्यात आले. आषाढी वारीच्या इतिहासात प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवेचा वापर करून गंभीर रुग्णाला पुढील उपचारांसाठी हलवण्यात आल्याची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री (Chief Minister) देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानतळावर (Airport) रुग्णाची भेट घेत त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांना आवश्यक उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील बाळू आसाराम पडूळ (वय ५४) हे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. दर्शनादरम्यान त्यांना अचानक छातीत वेदना जाणवू लागल्याने त्यांना तातडीने तीन रस्ता येथील अतिदक्षता कक्षात (Intensive Care Unit – ICU) दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital) हलवण्यात आले.
https://prahaar.in/2026/07/25/ashadhi-ekadashi-2026-the-reward-for-20-consecutive-years-of-pilgrimage-the-mane-couple-from-dharashiv-receives-the-honor-of-performing-the-mahapuja-of-lord-vitthal/
उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाची ईसीजी (ECG) तपासणी करण्यात आली. प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने एअर ॲम्ब्युलन्सद्वारे सोलापूर येथे हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटल (Yashodhara Hospital) मध्ये दाखल करण्यात आले असून हृदयरोगतज्ज्ञांकडून (Cardiologist) त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक (Civil Surgeon) डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली.
सोलापूर विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्स पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णाची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी डॉक्टरांकडून रुग्णाच्या प्रकृतीची माहिती जाणून घेत आवश्यक वैद्यकीय उपचार (Medical Treatment) तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार (MLA) देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर (Mayor) विनायक कोंड्याल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आषाढी वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी (Warkari) आणि भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात. आपत्कालीन परिस्थितीत (Emergency) गंभीर रुग्णांना वेळेत विशेष वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी राज्य शासनाने यंदा प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे गंभीर रुग्णांना अल्पावधीत मोठ्या रुग्णालयात हलवणे शक्य होत असून वारीतील आरोग्य व्यवस्थेला (Healthcare System) मोठे बळ मिळाले आहे