Home देश Monsoon Update : देशात पावसाची ३२ टक्के तूट, अनेक ठिकाणी खरिपाची पेरणी संकटात

Monsoon Update : देशात पावसाची ३२ टक्के तूट, अनेक ठिकाणी खरिपाची पेरणी संकटात

0
Monsoon Update : देशात पावसाची ३२ टक्के तूट, अनेक ठिकाणी खरिपाची पेरणी संकटात

नवी दिल्ली : जुलै महिना संपायला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. अद्याप देशात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडलेला नाही. ताज्या आकडेवारीनुसार देशात पावसाची ३२ टक्के तूट आहे. अपुऱ्या पावसामुळे खरिपाची शेती संकटात सापडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या पेरणीचे क्षेत्र ४.२ दशलक्ष हेक्टरने कमी झाले आहे. यामुळे यंदाच्या अन्न उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.

https://prahaar.in/2026/07/22/mumbai-lake-tansa-lake-which-supplies-water-to-mumbai-has-also-started-overflowing/

पावसाअभावी शेतकरी आणि सरकार चिंतेत आहे. दरवर्षी जून – जुलै दरम्यान देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये खरिपातील शेतीची कामं होतात. पेरणी आणि नंतरची शेतीची कामं मोठ्या प्रमाणावर केली जातात. पण यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस पडलेला नाही. याचा प्रतिकूल परिणाम शेतीवर झाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या साठ्यावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे यंदाच्या वर्षीच्या पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीत प्रशासकीय यंत्रणा चिंतेत आहे.

https://prahaar.in/2026/07/22/maharashtra-weather-update-next-72-hours-crucial-for-maharashtra-pune-on-red-alert-heavy-rainfall-in-several-areas-including-kalyan-dombivli/

ताज्या आकडेवारीनुसार दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सरासरीपेक्षा २६ टक्के, वायव्य भारतात १८ टक्के, आणि मध्य भारतात १३ टक्के पावसाची तूट आहे. पावसाच्या तुटीचा फटका शेतीच्या कामांवर झाला आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार १७ जुलै २०२६ पर्यंत देशभरात खरीप हंगामात महत्त्वाच्या पिकांची एकूण ६५८.१९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२.२८ लाख हेक्टरने कमी आहे. मागच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये १७ जुलैपर्यंत देशात खरीप पिकांची एकूण ७००.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.

यंदा कडधान्य पिकाच्या पेरणी क्षेत्रात सर्वाधिक घट झाली आहे. यंदा जेमतेम १२.२९ लाख हेक्टर शेतात कडधान्यांची पेरणी झाली आहे. तेलबिया पिकांखालील क्षेत्रात ८.६३ लाख हेक्टर घट झाली आहे. भाताच्या पेरणीतही १.४१ लाख हेक्टरने घट झाली आहे.

वेधशाळेच्या ताज्या अहवालानुसार मान्सून पुढी चार दिवस वायव्य आणि ईशान्य भारतात सक्रीय असेल. पण पुढील सात दिवस पश्चिम-मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताचा पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. जर पश्चिम-मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतामध्ये, जिथे आधीच मान्सूनची कमतरता आहे, पावसाची परिस्थिती सुधारली नाही, तर शेती मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here