पुणे: सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि दुर्गम वाटांवर वयाच्या अवघ्या ३ वर्षे आणि ४ महिन्यांच्या बालवयात एका चिमुरडीने इतिहास रचला आहे. बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी प्रसाद चव्हाण हिने सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तब्बल १०० गड-कोट सर करण्याचा आपला अद्वितीय संकल्प अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कामगिरीनिमित्त पुण्याच्या ऐतिहासिक रायरेश्वर किल्ल्यावर अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात ‘संकल्पसिद्धी सोहळा’ पार पडला.
https://prahaar.in/2026/07/21/kangana-ranaut-says-mps-were-scared-amid-cjp-protest-thanks-delhi-police-for-being-a-shiel/
चिमुकल्या पावलांनी पालथा घातला सह्याद्री
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पवित्र मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली, त्याच ऐतिहासिक रायरेश्वर मंदिरात श्री रायरेश्वराच्या अभिषेकाने आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत या विशेष सोहळ्याची सांगता झाली. वयाच्या अवघ्या दहाव्या महिन्यात किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन राजवर्धिनीने आपल्या गिर्यारोहण प्रवासाचा श्रीगणेशा केला होता.
त्यानंतर सिंहगड, शिवनेरी, रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि साल्हेर यांसह महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे व ऐतिहासिक गड-कोट तिने आपल्या छोट्या पावलांनी सर केले.
https://prahaar.in/2026/07/21/35-ancient-idols-of-ravana-discovered-in-mandya-and-mysore-direct-connection-to-the-ramayana-and-mahabharata-eras/
विश्वविक्रमांची नोंद आणि सर्वत्र कौतुक
अवघ्या तीन वर्षे आणि चार महिन्यांच्या बालवयात १०० गडांचा टप्पा पूर्ण करत राजवर्धिनीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तिच्या या अद्वितीय कार्याची दखल घेत ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये दोन वेळा तसेच ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये तिच्या या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. या चिमुरडीच्या देदिप्यमान यशाने संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली असून, तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.