नवी दिल्ली : बॉलीवूडची ‘क्वीन’ (bollywood Queen) आणि विद्यमान लोकसभा खासदार कंगना राणौत (Kangna Ranaut) हिने आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. संसद भवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कंगनाने आंदोलक आणि विरोधी पक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला. संसदेच्या कामकाजात सतत आणला जाणारा अडथळा अयोग्य असल्याचे सांगत, कुणाला पदावर ठेवायचे आणि कुणाला काढायचे यासाठी सरकारवर कोणताही दबाव टाकता येणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत तिने विरोधकांना खडसावले आहे.
View this post on Instagram
https://prahaar.in/2026/07/20/tripura-dgp-anurag-dhankar-found-dead-office-investigation-starts/
संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याचे महत्त्व अधोरेखित करताना खासदार कंगना राणौत म्हणाली की, अधिवेशन हे प्रामुख्याने जनतेच्या प्रश्नांवर आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यासाठी बोलावले जाते. त्यामुळे सभागृहाचे कामकाज विनाअडथळा सुरू राहणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून लोकप्रतिनिधींना आपले प्रश्न मांडता येतील. विनाकारण गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणण्याची विरोधकांची कृती अत्यंत चुकीची आहे. “देशातील जनतेने आम्हाला बहुमताने निवडून दिले आहे. त्यामुळे हे सरकार कसे चालवायचे आणि कोणते निर्णय घ्यायचे, हा सर्वस्वी आमचा अधिकार आहे,” असा ठाम युक्तिवाद तिने यावेळी केला. सरकारवर दबाव आणण्याच्या प्रयत्नांवरही कंगनाने सडकून टीका केली. कोणाला पदावर ठेवायचे आणि कोणाला हटवायचे, याबाबत विरोधक किंवा आंदोलक सरकारवर कोणतीही सक्ती करू शकत नाहीत. अशा प्रकारे निर्णय प्रक्रियेत दबाव आणणे म्हणजे एक प्रकारे ‘सरकारचे हात पिरगळण्याचा’ प्रकार असून, हे मुळातच योग्य नाही आणि असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराच तिने आपल्या विधानांतून दिला.
दरम्यान, आज सोमवारी सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस विरोधकांच्या गदारोळामुळे चांगलाच वादळी ठरला. विरोधकांनी ‘नीट-युजी २०२६’ (NEET-UG 2026) परीक्षेतील कथित गैरव्यवहार, शिक्षण व्यवस्थेतील विविध त्रुटी आणि अयोध्येर्भातील अपहाराच्या आरोपांवरून आक्रमक पवित्रा घेतला. या गंभीर विषयांवर सभागृहात तत्काळ चर्चा व्हावी, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्यातील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या देणग्यांसंद खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांचा हा गदारोळ न थांबल्यामुळे अखेर लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेच्या सुमारास तहकूब करावे लागले.