मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department – IMD) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. सोमवार, २० जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता जारी करण्यात आलेल्या नाऊकास्ट वॉर्निंगनुसार (Nowcast Warning), पुढील ३ तासांत काही ठिकाणी मध्यम ते अतिमुसळधार पावसाच्या (Moderate to Intense Rain) सरी कोसळण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, हा इशारा दुपारी १ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास (Travel) टाळावा तसेच सखल भाग, पाणी साचणारे रस्ते आणि पूरप्रवण (Flood-prone) परिसरात विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/07/20/wardha-samruddhi-mahamarg-accident-horrific-accident-on-samruddhi-mahamarg-car-catches-fire-five-killed-one-critically-injured/
मुंबई महानगर प्रदेशात (Mumbai Metropolitan Region – MMR) जोरदार पावसामुळे काही ठिकाणी वाहतूक (Traffic) विस्कळीत होण्याची आणि पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी आणि हवामानाची ताजी माहिती लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे, सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आणि स्थानिक प्रशासन (Administration) तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या (Disaster Management) सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.