नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकात भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. या पार्श्वभूमीवर, अनुभवी फलंदाज स्मृती मानधना हिने आपण अधिक मोठी जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे मान्य केले आहे. एका मुलखातीत मानधनाला भारतीय महिला संघाच्या कर्णधारपद हस्तांतरणाबाबत चर्चा सुरू आहे. विचारणा झाल्यास भारताचे नेतृत्व करण्यास तुम्ही तयार आहात का? यावर ती म्हणाली, “हो, नक्कीच. मी तयार आहे.”(India Womens Cricket Team)
https://prahaar.in/2026/07/15/international-service-begins-from-navi-mumbai-airport/
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेतून लवकर बाहेर पडण्याबाबत मानधना पुढे म्हणाली, “आत्मपरीक्षण करणे आणि चुकांमधून शिकणे महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने, आपण आपल्या मागील चुकांमधून पुरेसा बोध घेतलेला नाही आणि त्या चुकांची पुनरावृत्ती करत राहिलो आहोत. “आता पुढे पाहताना, २०२८ च्या टी-२० विश्वचषकापर्यंत या फॉरमॅटकडे कशा प्रकारे पाहायचे आणि एक संघ म्हणून आपल्याला काय करायचे आहे, याचा एक स्पष्ट रोडमॅप असणे आवश्यक आहे.”
https://prahaar.in/2026/07/15/goal-to-take-india-uk-trade-to-112-billion-by-2030/
भारतीय महिला संघ मे महिन्याच्या उत्तरार्धापासून इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्याची सांगता लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या महिलांच्या ऐतिहासिक अशा पहिल्यावहिल्या कसोटी सामन्याने झाली; या सामन्यात पाहुण्या संघाने २७० धावांनी दणदणीत विजय मिळवला.
https://prahaar.in/2026/07/15/shevgaons-sewage-project-stalled-for-10-years-despite-crores-being-spent-demand-for-inquiry-into-irregularities/
“लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या महिलांच्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्याचा भाग असणे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो सामना जिंकणे, ही एक अद्भुत गोष्ट होती. “भारताच्या या ऐतिहासिक विजयात योगदान देणे विशेष होते. लहानपणी आम्ही सर्वजणी कसोटी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहायचो, त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानावर ती संधी मिळणे हा अनुभव अधिकच अविस्मरणीय ठरला,” असे मंधाना म्हणाली.मंधानाने या सामन्याच्या दोन्ही डावांत सलग अर्धशतके झळकावली, तर भारताची आणखी एक महत्त्वाची क्रिकेटपटू ठरली ती म्हणजे यस्तिका भाटिया. लॉर्ड्सवर महिलांच्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली.