Birmingham : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारतीय गोलंदाजांना चांगलीच झुंज दिली. एका वेळी अवघ्या १०७ धावांत ६ गडी गमावून संकटात सापडलेल्या इंग्लंडने, सातव्या विकेटसाठी झालेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर सामन्यात पुनरागमन केले आहे. भारतासमोर आता विजयासाठी २५९ धावांचे आव्हान आहे.
https://prahaar.in/2026/07/14/fifa-world-cup-2026-mbappe-makes-history-breaks-five-major-records-at-the-2026-fifa-world-cup/
इंग्लंडचा डाव: सुरुवातीला पडझड, नंतर सावरले
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडची सुरुवात ठीकठाक झाली होती. बेन डकेट (४६) आणि जेकब बेथेल (१४) यांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या होत्या. मात्र, ही जोडी फुटल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला. अवघ्या १०७ धावांत इंग्लंडचे ६ मुख्य फलंदाज तंबूत परतले होते, ज्यामुळे संघ १५०-१८० धावांच्या आत आटोपेल असे वाटत होते. जसप्रीत बुमराहने हॅरी ब्रूकची तर इतर गोलंदाजांनी बटलर, सॅम करन आणि विल जॅक्स यांना स्वस्तात बाद करत भारताची पकड मजबूत केली होती.
https://prahaar.in/2026/07/14/bbl-schedule-schedule-for-australias-bbl-tournament-announced-the-first-match-will-be-held-in-india-find-out-where-and-when/#google_vignette
जो रूट आणि लियाम डावसन यांची जिद्द
इंग्लंडच्या डावाला सावरण्याचे काम जो रूट आणि लियाम डावसन यांनी केले. सातव्या विकेटसाठी या दोघांनी १२१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. लियाम डावसनने ८३ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. अक्षर पटेलने अखेर डावसनला बाद करून ही भागीदारी तोडली, मात्र तोपर्यंत इंग्लंडने २०० धावांचा टप्पा ओलांडला होता.
डावाच्या शेवटी जो रूटने संयमी फलंदाजी करत ७६ चेंडूत नाबाद ७६ धावा केल्या आणि संघाला २५८ धावांपर्यंत पोहोचवले. भारतीय गोलंदाजीसमोर आता इंग्लंडने ४७.५ षटकात सर्व गडी गमावून २५८ धावा केल्या असून, भारताला विजयासाठी २५९ धावांचे लक्ष्य गाठायचे आहे.
आता भारतीय फलंदाज हे आव्हान कशा प्रकारे पेलतात, याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.