कलबुर्गी : कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या घटनेत १५ हून अधिक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली आहे. विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. (Karnataka School poisoning)
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी शाळेत दिलेले अन्न खाल्ल्यानंतर काही वेळातच त्यांना मळमळ, उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागली. त्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने आरोग्य विभागाला माहिती दिली आणि सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, नेमके विषबाधेचे कारण काय आहे, याचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Karnataka School poisoning)
https://prahaar.in/2026/07/11/maharashtra-ats-raids-suspicion-of-links-to-a-pakistani-social-media-network-maharashtra-ats-conducts-a-major-operation-questioning-112-individuals/
दरम्यान, या घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, शाळांमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तपास अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. (Karnataka School poisoning)
View this post on Instagram