मुंबई : राज्यात पावसाचा (Rain) जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रादेशिक हवामान विभागाने (India Meteorological Department – IMD) मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी शनिवार (४ जुलै) आणि रविवारी (५ जुलै) रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ७ जुलैपर्यंत कोकण (Konkan) आणि घाट (Ghat) परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy to Extremely Heavy Rain) जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह नाशिक, पुणे आणि सातारा घाट परिसरातही शनिवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. या काळात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस, तर काही भागांत अति तीव्र मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
गेल्या तीन दिवसांत विक्रमी पाऊस
मुंबईतील कुलाबा (Colaba) आणि सांताक्रूझ (Santacruz) वेधशाळांमध्ये (Observatory) गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे.
https://prahaar.in/2026/07/04/khed-news-shocking-incident-in-khed-three-people-including-a-small-child-jumped-from-the-moving-mandvi-express/
कुलाबा येथे:
१ जुलै – ६९.६ मिमी (mm)
२ जुलै – १५८.२ मिमी
३ जुलै – १११.८ मिमी
एकूण तीन दिवसांत ३३९.६ मिमी पावसाची नोंद झाली.
सांताक्रूझ येथे:
१ जुलै – ९६.३ मिमी
२ जुलै – २०४.६ मिमी
३ जुलै – १०१ मिमी
https://prahaar.in/2026/07/04/leader-of-the-opposition-intimidates-staff-after-entering-the-mayors-chamber/
एकूण ४०१.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शुक्रवारी (३ जुलै) सकाळी ८.३० ते शनिवारी (४ जुलै) सकाळी ८.३० या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला होता. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे ३७ मिमी, तर सांताक्रूझ येथे ५१ मिमी पावसाची नोंद झाली.
१ जून ते ३ जुलै या कालावधीत मुंबई शहरात ७८०.७ मिमी, तर उपनगरांमध्ये ८१९.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जूनअखेरीस असलेली पावसाची तूट (Rain Deficit) आता भरून निघाली असून, दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाऊसमान (Excess Rainfall) नोंदवले गेले आहे.
मुसळधार पावसामागचे कारण काय?
हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान द्रोणीय स्थिती (Trough) कायम आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र (Low Pressure Area) अधिक तीव्र होत असून, हवेच्या खालच्या स्तरात विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांचा (Winds) प्रभावही वाढला आहे. या सर्व हवामान प्रणालींमुळे (Weather Systems) कोकण आणि घाट परिसरात मुसळधार पावसाचा जोर ७ जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.