Mumbai : आज सकाळपासून मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई व्यतिरिक्त ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, परिसरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/07/01/maharashtra-is-the-countrys-capital-when-it-comes-to-gst-chief-minister-devendra-fadnavis/
अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विले पार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे यांसह मुंबईच्या पश्चिम उपनगरातील काही भागांना मुसळधार पावसाचा तडाखा बसला. पालघर जिल्ह्यात मध्यरात्री सुरू झालेल्या पावसाने दुपारच्या सुमारास पुन्हा जोर धरला, ज्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले. याला प्रतिसाद म्हणून, पालघर जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. उद्या अर्थात गुरुवार २ जुलैलाही पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.पालघर जिल्ह्याला हवामान विभागाने गुरुवारी (२ जुलै) पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात पुढच्या २४ तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.