Home ब्रेकिंग न्यूज आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

0
आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक
train
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. राज्यातील विविध भागांतून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होत असतात. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन नागपूर, नवी अमरावती, खामगाव आणि भुसावळ येथून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/06/26/vaibhav-sooryvanshi-vaibhav-sooryvanshi-set-to-make-history-in-the-series-against-ireland-will-he-break-the-records-held-by-rohit-and-hardik/

नागपूर ते मिरज या मार्गावर गाडी क्रमांक ०१२०५ ही विशेष ट्रेन २३ आणि २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१२०६ ही २४ आणि २५ जुलै रोजी मिरजहून दुपारी १२.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला पंढरपूरसह अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा असेल.

नवी अमरावती ते पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०१११९ ही २१ आणि २४ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०११२० ही २२ आणि २५ जुलै रोजी रात्री ७.३० वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी १२.५० वाजता नवी अमरावतीला पोहोचेल.

खामगाव ते पंढरपूर मार्गावर गाडी क्रमांक ०११२१ ही २१ आणि २३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०११२२ ही २२ आणि २४ जुलै रोजी पहाटे ५ वाजता पंढरपूरहून सुटून त्याच दिवशी रात्री ७.३० वाजता खामगावला पोहोचेल.

https://prahaar.in/2026/06/26/jharkhand-accident-news-truck-rams-into-passenger-vehicle-in-ramgarh-7-dead/

भुसावळ ते पंढरपूर विशेष गाडी क्रमांक ०११५९ ही २४ आणि २५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०११६० ही २५ आणि २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळला पोहोचेल.

या विशेष गाड्यांमुळे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीट आगाऊ आरक्षित करून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.