नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का बसला आहे. तृणमूलमधून बाहेर पडलेल्या २० बंडखोर खासदारांच्या गटाने रविवारी ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ या पक्षात विलीन होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या विलीनीकरणानंतर बंडखोर गटाने केंद्र सरकारमधील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.
https://prahaar.in/2026/06/15/adequate-stock-of-fertilizers-in-the-country-for-the-kharif-2026-season/
बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन एनसीपी पक्षात विलीन झाल्याचे आणि एनडीएला पाठिंबा देत असल्याचे अधिकृत पत्र सुपूर्द केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्यातील कायदेशीर गुंतागुंत आणि अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी बंडखोर टीएमसी खासदारांनी या नोंदणीकृत पक्षासोबत जाण्याचा पर्याय निवडला.
https://prahaar.in/2026/06/15/what-happened-after-530-pm-that-drove-sanchita-to-take-such-an-extreme-step/
ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू आणि ज्येष्ठ खासदार सुदीप बंडोपाध्याय आता बंडखोरांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे बंडखोर गटाची ताकद प्रचंड वाढली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना बंडोपाध्याय यांनी थेट ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले. ते म्हणाले, “आम्ही ‘नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ या मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षात अधिकृतपणे विलीन झालो आहोत. आता खरी टीएमसी कोणती, याचा फैसला न्यायालयातच केला जाईल.” बंडखोर खासदार आणि आमदारांच्या आग्रहास्तव आणि लोकहितासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.