ओमान : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, ‘होर्मुझ सामुद्रधुनी’च्या दक्षिणेला २४ भारतीय खलाशी असलेल्या ‘एमटी मारिव्हिक्स’ या जहाजाला लक्ष्य करण्यात आले आहे. या जहाजावर आग लागल्याच्या घटनेला केंद्रीय बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने सोमवारी दुजोरा दिला. जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सध्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचे मंत्रालयाने सांगितले.ओमानने हेलिकॉप्टरद्वारे खुलाशांना एअरलिफ्ट केले आहे.
View this post on Instagram
सोमवारी दुपारी सुमारे दीड वाजता जहाजावर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली, यानंतर भारत सरकारच्या प्रतिनिधीने जहाज कंपनीशी संपर्क साधला. भारताचा ओमानमधील दूतावास पण सक्रीय झाला. ओमान सरकार तसेच जहाजावरील खलाशी यांच्याशीही समन्वय साधण्यात आला. काही वेळानंतर ओमानच्या हेलिकॉप्टरद्वारे टप्प्याटप्प्याने भारतीय खुलाशांना एअरलिफ्ट करून वाचवण्यात आले. सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत.
We are thankful to the Omani authorities for their swift response and rescue of all the 24 crew members of Indian nationality , onboard MT Marivex, and ensuring their safety.@MG_MOD_OMAN @OMAN_MSC@SpokespersonMoD@indiannavy@MEAIndia
— India in Oman (Embassy of India, Muscat) (@Indemb_Muscat) June 8, 2026
https://prahaar.in/2026/06/08/israel-iran-conflict-indian-ship-attacked-oman-coast-24-sailors-trapped/
याआधी रिकामे तेलवाहक जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडून दक्षिणेच्या दिशेने बरेच पुढे गेले होते. या जहाजावर भारतीय खलाशी होते. नेमका याच जहाजावर हल्ला झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराणचे जहाज समजून अमेरिकेकडूनच या रिकाम्या जहाजावर हल्ला झाला होता.
युनियनने सोशल मीडियावर मागितली मदत
‘फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया’ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एक पोस्ट करून ओमानच्या किनारपट्टीजवळ अडकलेल्या भारतीय खलाशांसाठी तातडीने मदतीची मागणी केली होती. या पोस्टची त्वरित दखल घेत ओमानमधील भारतीय दूतावासाने जहाजावरील खलाशांशी थेट संपर्क प्रस्थापित केला असून आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात असल्याचे सांगितले.
https://prahaar.in/2026/06/08/powerful-7-8-magnitude-earthquake-hits-philippines/
३,५०० हून अधिक खलाशांची सुरक्षित सुटका
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाने ‘डीजी शिपिंग’च्या माध्यमातून २४ तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. या नियंत्रण कक्षाने आतापर्यंत १२ हजारांहून अधिक कॉल्स आणि २६ हजारांपेक्षा जास्त ईमेल्स हाताळले आहेत. गेल्या ९६ तासांतच खलाशांच्या कुटुंबीयांकडून ३९० कॉल्स आले आहेत. नियंत्रण कक्षाने समन्वय साधल्यामुळे ३५०० पेक्षा जास्त खुलाशांना संकटातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले आहे.