Home देश Viral : तब्बल ९ वर्षे IT क्षेत्रात मॅनेजर, आता चालवते रिक्षा, भक्कम पगाराच्या नोकरीला रामराम ठोकत घेतला धाडसी निर्णय…

Viral : तब्बल ९ वर्षे IT क्षेत्रात मॅनेजर, आता चालवते रिक्षा, भक्कम पगाराच्या नोकरीला रामराम ठोकत घेतला धाडसी निर्णय…

0
Viral : तब्बल ९ वर्षे IT क्षेत्रात मॅनेजर, आता चालवते रिक्षा, भक्कम पगाराच्या नोकरीला रामराम ठोकत घेतला धाडसी निर्णय…

Viral Video : मोठ्या आयटी कंपन्यांमधील आकर्षक पगार, शानदार जीवनशैली आणि करिअरची चमक अनेकांना आकर्षित करते. मात्र या मागील ताणतणाव अनेकदा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करताना दिसत आहेत. अशाच एका महिलेने कॉर्पोरेट जगतातील तणावाला कंटाळून आयुष्याला वेगळे वळण दिले आहे. तिची कहाणी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

https://prahaar.in/2026/05/31/chirag-tyagi-he-returned-after-winning-the-gold-medal-but-never-reached-home-25-year-old-indian-para-runner-chirag-tyagi-shot-dead/

९ वर्ष IT क्षेत्रात करियर

व्हायरल व्हिडिओनुसार, संबंधित महिला तब्बल नऊ वर्षे आयटी क्षेत्रात मॅनेजर पदावर कार्यरत होती. मोठा पगार, प्रतिष्ठित पद आणि सुरक्षित करिअर असूनही सततच्या डेडलाईन्स, कामाचा ताण आणि मानसिक दबावामुळे तिचे वैयक्तिक आयुष्य विस्कळीत झाले होते. अखेर या महिलेने आयटी क्षेत्र सोडून रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. कॉर्पोरेट जीवनातील ताण त्रासदायक झाल्यानंतर तिने नोकरीचा राजीनामा देत पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला. आज ती रिक्षा चालवते आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत आहे. विशेष म्हणजे, या व्यवसायातून ती महिन्याला सुमारे ६० हजार रुपये कमावत असल्याचा दावा केला जात आहे.

व्हायरल व्हिडीओतून केलेला दावा

व्हिडिओमध्ये बोलताना ती म्हणते, आता माझ्यावर कोणत्याही बॉसचा दबाव नाही आहे. आता मी माझ्या वेळेनुसार काम करते आणि आयुष्याचा आनंद घेते. पूर्वी पैशांसोबत ताणवही होता, आता मनाला शांतता मिळते आहे. तिने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मानसिक ताण कमी झाला असून सध्याचे आयुष्य अधिक समाधानकारक वाटत असल्याचे ती म्हणाली. सध्या या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काहींनी तिच्या धाडसी निर्णयाचे कौतुक केले, तर काहींनी इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी तिने आर्थिक नियोजन केले असावे, असे मत व्यक्त केले. या निमित्ताने कॉर्पोरेट क्षेत्रातील तणावाचा विषय चर्चेत आहे आणि मानसिक आरोग्याचं महत्त्व वाढलं आहे.ताज्या घटनेमुळे आजच्या तरुण पिढीची बदलती मानसिकता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केवळ मोठा पगार किंवा प्रतिष्ठित नोकरी यापेक्षा मानसिक समाधान, काम आणि जीवन यातील समतोल तसेच आनंदी आयुष्य यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे या घटनेतून दिसून येते आहे. जगातील ताणतणाव आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, या महिलेचा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी आणि विचार करण्यासारखा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here