Crime News : कल्याण शहरात नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका वडिलांनी स्वतःच्या विवाहित मुलीची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.
https://prahaar.in/2026/05/30/simpostor-gadge-baba-granted-bail-after-42-days/
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील पार नाका परिसरात राहणाऱ्या गायत्री वसईकर हिने काही महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह केला होता. याआधी तिचा साखरपुडा ठरला होता. मात्र, तिने तो मोडून स्वतःच्या पसंतीच्या युवकासोबत लग्न केले होते. या निर्णयामुळे तिचे वडील विनोद वसईकर प्रचंड नाराज होते. घटनेच्या दिवशी गायत्री माहेरी आली होती. दुपारच्या जेवणानंतर घरात पुन्हा एकदा प्रेमविवाहाच्या मुद्द्यावरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मुलीने कुटुंबाचे ऐकले नाही याचा राग आरोपीच्या मनात कायम होता. वाद वाढत गेला आणि संतापाच्या भरात विनोद वसईकर यांनी धारदार शस्त्राने गायत्रीवर हल्ला केला.
https://prahaar.in/2026/05/30/tukaram-mundhe-strikes-hard-bhiwandi-connection-to-punes-toxic-liquor-tragedy-which-claimed-22-lives-expose/
हल्ल्यात गायत्री गंभीर जखमी झाली होती. तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते. जास्त रक्त वाहण्यामुळे तिचा जागीच थोड्या वेळाने मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी वडील फरार झाले होते. मात्र, बाजारपेठ पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवत त्यांना अटक केली. या घटनेमुळे कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रेमविवाहावरून स्वतःच्या मुलीचा जीव घेण्याइतका संताप कसा निर्माण झाला, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कुटुंबातील मतभेद, सामाजिक दबाव आणि वैयक्तिक निर्णयांमुळे निर्माण होणारे तणाव किती टोकाला जाऊ शकतात, याचे हे अत्यंत धक्कादायक उदाहरण मानले जात आहे. सध्या बाजारपेठ पोलीस या प्रकरणाचा सखोल तपासणी करत आहेत.