Home क्रीडा IPL IPL 2026 नंतर मोठा धक्का! ऋषभ पंतने सोडलं LSGचं कर्णधारपद; फ्रँचायझीचं अधिकृत वक्तव्य आले समोर

IPL 2026 नंतर मोठा धक्का! ऋषभ पंतने सोडलं LSGचं कर्णधारपद; फ्रँचायझीचं अधिकृत वक्तव्य आले समोर

0
IPL 2026 नंतर मोठा धक्का! ऋषभ पंतने सोडलं LSGचं कर्णधारपद; फ्रँचायझीचं अधिकृत वक्तव्य आले समोर

Mumbai : ऋषभ पंतने आयपीएल २०२६ मधील निराशाजनक हंगामानंतर लखनऊ सुपर जायंट्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी फ्रँचायझीकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पंतने स्वतः कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती आणि एलएसजी व्यवस्थापनाने ती तात्काळ स्वीकारली अशी माहिती लखनऊने आपल्या सोशल मीडियावरून कळवले आहे.

LSG ने अधिकृत निवेदनात म्हटलं की,

ऋषभ पंतने कर्णधारपद सोडण्याची विनंती केली होती. आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करत ती स्वीकारली आहे. आता नव्याने संघ उभारणीवर आमचं लक्ष असेल.

27 कोटींचा स्टार, पण विफलता

आयपीएल २०२५ च्या आधी पंतला विक्रमी २७ कोटी रुपयांत संघात सामील करण्यात आले होते. मात्र सलग दोन हंगाम एलएसजी प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.आयपीएल २०२६ मध्ये संघाने चौदापैकी केवळ चार सामने जिंकले आणि गुणतालिकेत दहाव्या स्थानावर घसरला.

https://prahaar.in/2026/05/29/ipl-trade-bomb-will-hardik-pandya-go-to-csk-talk-of-big-trade-in-exchange-for-shivam-dube-ayush-mhatre/

पंतची कामगिरी कशी होती?

या हंगामात पंतने १४ सामन्यांत ३१२ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३३.६१ आणि स्ट्राइक रेट १४६.७९ राहिला. हंगामाच्या सुरुवातीला सलामीवीर म्हणून उतरलेला पंत नंतर तिसऱ्या क्रमांकावर आणि अखेरीस मधल्या फळीत खेळताना दिसला होता. आरसीबी विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने शतक झळकवले. ही खेळी त्याच्या या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

पुढचा कर्णधार कोण?

पंतच्या राजीनाम्यानंतर आता Aiden Markram आणि Mitchell Marsh यांची नावं पुढील कर्णधारपदासाठी चर्चेत आली आहेत. दरम्यान, क्रिकेट संचालक Tom Moody यांनीही नेतृत्वबदलाचे संकेत दिले होते. त्यांनी म्हटलं होतं की संघाला नवीन सुरुवात करण्याची गरज आहे.

https://prahaar.in/2026/05/29/ipl-final-2026-western-railway-to-run-special-mumbai-ahmedabad-train-for-cricket-fans/

चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

पंतच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही चाहत्यांनी पंतच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तर काहींनी संघ व्यवस्थापनालाच अपयशासाठी दोषी ठरवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here